शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

सिंचन क्षेत्र ‘जैसे थे’च!

By admin | Published: April 17, 2016 2:42 AM

सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी

जळगाव : सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी गुंतवणूक झाली नाही. राज्याचे एक टक्का सिंचन क्षेत्रही वाढले नाही. मराठवाडा, खान्देशात बिकट स्थिती आहे. ही राज्यासाठी अशोभनीय बाब असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली. जैन हिल्सवर आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री पतंगराव कदम, कविवर्य ना.धों. महानोर, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या वेळी ‘डाळिंब रत्न’ व ‘हिरालाल जैन डाळिंब नव तंत्र’ पुरस्काराने शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. शरद पवार म्हणाले, पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. टीव्ही सुरू केला की पाणीप्रश्नाचीच चर्चा सुरू असते. सत्ता येते व जाते. सत्ता हा मुद्दा नाही. परंतु जनतेशी बांधिलकी महत्त्वाची आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळायला हवे. या प्रश्नासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत, सहकार्य करायला तयार आहोत. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम उत्तर प्रदेश, दाक्षिणात्य राज्यातील काही भागांमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असणारीकेळी व ऊस ही पिके घेणे बंद केले पाहिजे.गव्हासारखी पिके वर्षभरात दोनदा घ्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना अधिक वेळ शेतीसाठी द्यायचा नाही त्यांनी ऊस लावावा. पण ज्यांना पैसे हवे आहेत त्यांनी डाळिंब लावायला हवे. पण शेती करताना सोसायट्या, ग्रा.पं. निवडणुकीच्या भानगडीत पडू नका, असेही पवार यांनी सांगितले. जैन हिल्स शेतकऱ्यांची पंढरीराज्यात चांगली शेती करणारे लोक जळगावात आहेत. भागवत पाटील, वसंतराव महाजन, डी.के. महाजन अशी अनेक नावे पवार यांनी आपल्या भाषणात घेतली. जळगाव शेतीचे केंद्र बनत आहे, त्यातच जैन हिल्स शेतकऱ्यांची पंढरी आहे. स्व. भंवरलाल जैन यांनी शेतीसंबंधी केलेल्या कार्याचा देशाला लाभ होत असल्याचेही पवार म्हणाले.