ऑनलाइन लोकमत
पुणे - विद्यानगरी बनलेलं पुणे वसलं तेच मुळा-मुठेच्या काठाकाठानं. पुण्याच्या संस्कृतीनं स्थिरावण्यासाठी नदीकाठचा आधार शोधला. पण माणसाची हाव, निसर्गावरच आक्रमण आणि हे मूळ आक्रंदन निमूटपणे पाहण्याची अलिप्त वृत्ती मुठा नदी आणि मानवी जीवनाच्या मुळावर उठली आहे. २००५ मध्ये महापालिकेच्या कारभा-यांनी पुण्याच्या विकास आराखडयात केलेले घातक बदल मुठेच पात्र तर गिऴंकृत करत आहेतच पण इथे गृहप्रकल्प उभारणीला दिलेली परवानगी उद्या मानवी जीवन धोक्यात आणेल.
इन्टॅक, पुणे या संस्थेसाठी दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी तयार केलेला बोलका माहितीपट. या माहितीपटासाठी विशेष आभार अनु आगा, आरती किर्लोस्कर (पारिजात फाऊंडेशन), अरुण फिरोदीया (अभिजात ट्रस्ट), रवी पंडित, सारंग यादवदकर, असिम सरोदे, अजित जोशी, दिलीप मोहिते, लीला ब्रूमी, नरेंद्र चुंग, नितीन वैद्य, परीनिता दांडेकर, डॉ. प्रल्हाद पोटे, एस.व्ही.गाडगीळ, सचिन खेडेकर, संजय भोसले, संग्राम किर्लोस्कर, सुजीत पटवर्धन, सुमित्रा भावे, सुनिल सुक्तनकर, सुप्रिया गोतुरकर-महाबळेश्वरकर, विवेक वेलणकर