शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

आसाममधील विजयाचा संघाने रचला पाया

By admin | Published: May 19, 2016 10:19 PM

लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांत संघ स्वयंसेवकांनी सक्रिय प्रचार केला नसला तरी विजयाचा खरा पाया त्यांनीच रचला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले

योगेश पांडे

नागपूर : आसाममध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांत संघ स्वयंसेवकांनी सक्रिय प्रचार केला नसला तरी विजयाचा खरा पाया त्यांनीच रचला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले असून तळागाळापर्यंत तेथील स्वयंसेवक व प्रचारक पोहोचत आहेत. खडतर परिस्थितीत संघ प्रचारकांनी दुर्गम क्षेत्रात केलेल्या कार्याची पावती भाजपाला या विजयाच्या रूपात मिळाली. आसाममध्ये संघाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अगदी स्वातंत्र्यानंतरच संघाने पूर्वोत्तर राज्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. या भागात वाढणारे धर्मांतरण, सीमेवरून होणारी घुसखोरी, शिक्षणाचा अभाव इत्यादी मुद्यांवर संघाने वेळोवेळी चिंता व्यक्त केली व यासंदर्भात विविध उपक्रमदेखील राबविले. या मुद्यांवर संघ प्रचारकांनी अगदी दुर्गम भागात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. या कामात अडचणी येत असल्याने येथे सत्ता यावी, अशी संघ धुरिणांची इच्छा होती.

त्यामुळेच येथील शाखाविस्तारावरदेखील भर देण्यात आला होता. शिक्षणावर दिला भर विद्यार्थी व तरुणांच्या समस्यांवरदेखील संघ पदाधिकारी सातत्याने काम करत होते. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी एकल विद्यालयांचा प्रयोग राबविण्यात आला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये ३०० हून अधिक एकल विद्यालय चालत आहेत. याशिवाय हिंसाग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागात संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांवर देशात निरनिराळ्या ठिकाणी हल्ले झाले होते. त्यावेळी संघाने त्यांना मदतीचा हात दिला होता. नागरिकांमध्ये जागविला संघाबाबत विश्वास नागरिकांमध्ये जागविला संघाबाबत विश्वास गेल्या काही कालावधीत आसाममधील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर संघ प्रचारकांनी भर दिला होता. दोन वर्षेंअगोदर आसाममध्ये भडकलेली जातीय हिंसा असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येकवेळी संघ स्वयंसेवक स्थानिक नागरिकांसोबत उभे राहिले व मदतीचा हात दिला.

सेवा भारती तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आसाममध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आदिवासी, दुर्लक्षित नागरिकांसाठी विविध योजनादेखील सुरू आहेत. सीमाभागातदेखील संघाने कामावर भर दिला व सुनील देशपांडे यांनी तर आसाम अक्षरश: पिंजून काढले. भाजपाच्या प्रचाराची जबाबदारीदेखील संघाचे माजी प्रवक्ते राम माधव यांच्याकडेच देण्यात आली. याचाच फायदा विधानसभा निवडणुकांमध्ये झाला अन् भाजपाला ऐतिहासिक यश मिळाले. राष्ट्रीय शक्तींना जनतेचे समर्थन आसाममधील या ऐतिहासिक विजयाबद्दल संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय विचारसरणीच्या शक्तींना जनतेने दिलेले हे समर्थन आहे. संघाचे या भागात फार अगोदरपासून विधायक कार्य सुरू आहे. कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून काम करण्यात येत नाही. विचार असतो तो फक्त देशाचा. अतिशय विपरीत परिस्थितीत येथे कामाला सुरुवात केली होती. या विजयामुळे येथील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला आहे. -डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ