शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

By admin | Published: July 08, 2017 3:51 AM

मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी बेकायदेशीर असून, त्यांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये केलेली कृतीदेखील कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.शिर्के यांच्याविरुद्ध बेकायदेशीर पाटी लावल्याबद्दल छावणी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मालेगाव येथे काही व्यक्ती गार्इंची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून गोवंश संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना मारहाण केली होती. त्यानंतर, गोवंश संरक्षण समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.संगमेश्वर भागात नंतर मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला झाला. त्यावरून छावणी पोलीस ठाण्यात तन्वीर खान खलीलखान यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. प्रमुख संशयित तन्वीर खान याचा मालेगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता़मात्र, त्याच वेळी न्यायालयाने शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी कायदेशीर आहे किंवा कसे, याबाबत सरकारने शहानिशा करावी. पाटी लावणे बेकायदेशीर असेल, तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही केली, याचा खुलासा करावा, अशी सूचना सरकारला केली होती. त्यानुसार, सरकारने हे स्पष्टीकरण न्यायालयात केले़बेकायदेशीर पाटीबाबत गुन्हा दाखलअलीकडेच न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे तन्वीर खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झाली. सरकारतर्फे वाहनावर ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी शिर्के लावू शकत नाहीत. त्यांचे कृत्य बेकायदेशीर असून, शिर्के हे प्राणी कल्याण अधिकारी नाहीत, शासनाच्या प्राणी कल्याण समितीचे ते सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी गोवंश रक्षक म्हणवून घेणेही चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. शिर्के यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान् वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले.बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई ?मालेगाव येथील घटनेत न्यायालयाने खासगी वाहनांवर लावण्यात आलेल्या पाटीबद्दल सरकारला जाब विचारल्याने, पोलिसांना यापुढे बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई करावी लागू शकते.