शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

मुंबईसह १४ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम महिनाभर चालणार?, निकाल मात्र एकाच दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 5:21 AM

महिनाभर निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे.

गौरीशंकर घाळे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील १४ महापालिकांसह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येणार नाहीत. महिनाभर निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुटीत अनेकजण बाहेरगावी जातात, त्यामुळे शाळांचे निकाल लागण्याआधी निवडणूक घेण्याचा आग्रह राजकीय पक्षांनी धरला असून, त्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पण या सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी लागण्याची शक्यता आहे. 

राज्यातील १४ महानगरपालिका, २०८ नगर परिषदा, १४ नगर पंचायती, २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमयासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बुधवारी (दि. २) बैठक झाली. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, सीपीआय आणि बसपाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकत्र घेता येणार नाहीत. महिनाभर निवडणुका चालण्याची शक्यता असून, सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर करायचे, की जशा निवडणुका होतील तशा घोषित करायच्या, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. नंतर एकाचवेळी निकाल देण्याकडे सर्व पक्षांचा कल होता, असे समजते.

येत्या एक-दोन दिवसांत प्रभागांचे सीमांकन अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया होईल. उन्हाळी सुटीत अनेक नागरिक बाहेरगावी जातात. त्यामुळे शाळांचे निकाल लागण्याआधी निवडणुका पार पाडण्याची मागणी पक्षांनी केली. तर निवडणुकांची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेत स्थळासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा असेल. निवडणूक खर्च सादर करणे, मतदारांना उमेदवारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी; तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर मोबाइल ॲपचीही सुविधा असेल, असे मदान यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्र