शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

आयटीचे जाळे राज्यभर विणावे

By admin | Published: April 06, 2016 5:00 AM

आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे,

नवी मुंबई : आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. राज्यात तरुणांची संख्या अधिक असून, आयटी क्षेत्रात त्यांच्या बुद्धीचा वापर करून घेतल्यास महाराष्ट्राची छाप जगात पडेल, असा विश्वास त्यांनी ऐरोलीत व्यक्त केला.येथील खासगी नॉलेज पार्कचे उद्घाटन व दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्यासह कंपनीचे संचालक पॉल हर्मलीन व इतर मान्यवर उपस्थित होते. आयटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात आयटी धोरण अधिक सक्षम केले जात आहे. नव्याने राबवल्या जाणाऱ्या या धोरणात आयटी कंपन्यांना अधिकाधिक सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे व्यक्त केली. सध्या मुंबई, नवी मुंबई अशा ठरावीक शहरांमध्येच आयटी कंपन्या आपला जम बसवत आहेत. यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण शहरी भागांकडे धाव घेत आहेत. शिवाय काही ठरावीक शहरांचीच विशेष ओळख तयार होत आहे. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न करावेत. त्याकरिता नागपूर व सांगलीसारख्या शहरांचाही विचार व्हावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचवले. लोकसंख्येत तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. हे तरुण बुद्धीच्या बळावर राज्याला तंत्रज्ञानात पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)