शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

भाजपाला उमेदवार मिळू नयेत हे दुर्दैव

By admin | Published: January 03, 2017 6:33 AM

ज्या भाजपाचा जन्म १९५२ मध्ये झाला, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी अजूनही उमेदवार मिळू नये, हे दुर्दैैव आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले.

पुणे : ज्या भाजपाचा जन्म १९५२ मध्ये झाला, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी अजूनही उमेदवार मिळू नये, हे दुर्दैैव आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले. आता पालिका निवडणुकीसाठी मनसेचे लोक पळवित आहेत, मात्र माझ्याकडे खूप लोक आहेत. भाजपाच्या लोकांना केवळ घोषणा करायची हौस आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी भाजपाच्या इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यावर जोरदार टीका केली. भांडारकर रस्त्यावरील मनसेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे उपस्थित होते. नोटाबंदी, राम मंदिर, शिवस्मारक आदी मुद्द्यांवर ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान भाषण देत असताना त्यांच्या देहबोलीवरून ते जाणवत होते. भाजपाच्या नेत्यांना लोकप्रिय घोषणा करण्याची हौस आहे. राम मंदिर बांधण्याची घोषणा करून त्यांनी अनेक खासदार निवडून आणले, मात्र पूर्ण बहुमत असताना त्यांना अजून राम मंदिर उभारता आले नाही अन् मुंबईतल्या एका स्टेशनला त्यांनी राम मंदिर हे नाव दिले.’’राज्य सरकार शिवस्मारक उभारणी, मेट्रो करणार अशा अनेक घोषणा करीत आहे. मात्र त्यासाठी लागणारा पैसा ते कुठून आणणार आहे, हे कुणीच विचारत नाही. शिवस्मारकात उभारला जाणारा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल, असा दावा भाजपावाले करीत आहेत, मात्र त्यासाठी योग्य तो अभ्यास त्यांनी केलेला नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. जात, धर्म, भाषा आदी मुद्द्यांवर मते मागू नयेत, असे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्याबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी सेवा देताना मराठी भाषेचा वापर करावा यासाठी आंदोलन केले तर त्यात गैर काय.’’