शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 1:23 PM

Nitesh Rane: मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. - नितेश राणे

महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. एकदाचे पॅकअप करून त्यांना कायमचे लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना मोलाचा सल्लाही दिला आहे.

अकोल्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत मांडले. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास 10 ते 15 दिवस केस दाखल करत नाहीत. मुलीच्या आई वडिलांसोबत गैरव्यवहार करत आहेत. या अधिकाऱ्यांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होते, अशा सडक्या आंब्यांना मी इशारा दिलेला आहे, असे राणे म्हणाले. 

आमदारांना म्हाडा घराची लॉटरी बाबत बोलताना त्यांनी अशी काही उदाहरणं असतील तर संबंधित आमदारांनी भूमिका जाहीर करावी, काही सामान्य घरातील व्यक्ती आमदार होतात, पण सगळेच आमदार आर्थिक सक्षम नसतात, असे राणे म्हणाले. 

बहीणीविरोधात बायकोला निवडणुकीला उभे करायला नको होते, असे वक्तव्य अजित पवार यांनी नुकतेच केले होते. यावर विचारले असता नितेश राणे म्हणाले की, अजित पवार अनुभवी नेते आहेत. कुठल्यातरी अनुभवाणे हे मत व्यक्त केले असेल. त्यामुळे महायुतीवर काही परिणाम होणार होईल असे इमले बांधणे चुकीचे आहे. एका वक्तव्याने महायुतीच्या बाहेर पडतील असे काही नाही, असे राणे म्हणाले. 

मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. ते मराठा आरक्षणाविषयी बोलतील तेवढे त्यांच्या हिताचे आहे. सर्वच नेत्यांची स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमिका जाहीर करावी. शरद पवारांवर टीकेची जरांगे यांनी पहिल्या दिवशी अशी भूमिका घेतली असती ना तर लोकांना विश्वास बसला असता. आता चारही दरवाजे बंद झाले आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे