शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

जैन संघटना आगामी काळात शेतकरी, युवकांसाठी काम करणार

By admin | Published: January 11, 2016 1:13 AM

पारस ओसवाल यांची माहिती : द्वैवार्षिक अधिवेशनाची सांगता

बाहुबली : मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय जैन संघटना कार्य करीत आहे. त्याची व्याप्ती संपूर्ण देशभर आहे. आगामी काळात संघटना शेती शेतकरी व युवक युवतींच्या प्रगतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष व कोल्हापूरचे प्रसिद्ध जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष व कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती पारस ओसवाल यांनी केले. ते कुभोजगिरी येथे आयोजित भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या सांगता समारंभात बोलत होते.ओसवाल यांनी आगामी वर्षभरामध्ये राज्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या विधायक कामांची कार्यपद्घती राज्यातील कार्यकर्त्यांसमोर मांडली. वेळेसोबत चालेल तो टिकेल अन्यथा तो मिटेल, त्यामुळे संघटनेच्या पदधिकाऱ्यांना त्यांनी प्रगतीसाठी नवनवीन कार्यप्रणाली अवलंबण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात संघटनेकडून ‘‘जेम्स फॉर इंडिया’’ असा नारा दिला. प्रत्येक व्यक्तिने भारतासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बीजेएस यावर्षी जैन व जैनेतर समाजासाठी विविध विधायक कार्ये घेऊन अत्यंत जोमाने कार्य करणार असल्याचे विविध राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प जैन समाजासाठी राबविण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. त्यामध्ये जैन समाजातील व्यापाऱ्यांसाठी व्यापारवृद्घी कार्यशाळा, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधन, कौटुंबिक कलह निवारण्यासाठी विशेष प्रकल्प, युवक-युवतींना जोडीदार निवडण्याची पारंपरिक पद्धत बंद करून नवीन प्रथा सुरू करणे, मूल्यशिक्षणावर आधारित शिक्षणप्रणाली वाढविणे, अल्पसंख्याक कार्यशाळांचे आयोजन, आदी अनेक कार्यक्रमांचे बृहत नियोजन करण्यात आले आहे. सांगता समारंभाप्रसंगी अशोक संघवी सरेंदग जैन, हस्तिलाला बंब या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)भारतीय जैन संघटनेचा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीचा मूल्य शिक्षणाचा शास्त्रशुद्ध प्रकल्प राज्य सरकारने स्वीकारला आहे. ३४ जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी आगामी काळात होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना मूल्यशिक्षणाचा प्रकल्प देशभरातील १४ लाख शाळांपर्यंत मोफत पोहचविण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. देशभरातील इयत्ता आठवी ते १२ वीच्या मुलांना आय.आय.एम., आय.आय.टी., आय.ए.एस., देहरादून जे.जे.आर्ट, होमीभाभा रिसर्च येथे ‘शैक्षणिक प्रबोधन सहल’ काढण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठांशी करार करून महाविद्यालयीन युवतींचे प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट.या अधिवेशनात भारतीय जैन संघटना (बीजेएस) आता संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक पुनर्वसनासाठी पुण्यात आणणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुथा यांनी महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत वाढत चाललेल्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. येत्या तीन-चार महिन्यांत २०१४ व २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या ४८०० ते ५००० शेतकऱ्यांच्या घरी जाऊन, सर्वेक्षण करून त्यांच्या मुला-मुलींना येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी आणण्याचा निर्णय या अधिवेशनात सहमतीने घेतला.