शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

जैन धर्मीयांचे योगदान मोठे

By admin | Published: April 20, 2016 5:37 AM

देशातील आर्थिक विकासात जैन धर्मीयांचे योगदान नेहमीच मोठे राहिलेले आहे. जैन बांधव हा दान देण्यात विश्वास ठेवतो आणि त्या विचारातूनच समाजासाठी अनेक उपक्रम

मुंबई : देशातील आर्थिक विकासात जैन धर्मीयांचे योगदान नेहमीच मोठे राहिलेले आहे. जैन बांधव हा दान देण्यात विश्वास ठेवतो आणि त्या विचारातूनच समाजासाठी अनेक उपक्रम राबवित असतो. सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जैन बांधवांनी तेथील गोवंश वाचविण्यासाठी उपक्रम सुरू करावेत. या उपक्रमातून गोसेवा होईल आणि शेतकऱ्यांना मदतही होईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जैन महामंडलच्या वतीने दादर येथे आयोजित २६१५ व्या भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाप्रसंगी फडणवीस बोलत होते. या वेळी आमदार राज पुरोहित, महामंडलाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश धाकड, समाजसेवक सुभाष रुणवाल, बी. सी. जैन, बाबुलाल बाफना, महिला अध्यक्ष कुमुद कच्छरा, चंदा रुणवाल, आर. के. जैन, बाबूलाल जैन आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाजातील संघर्ष संपविण्यासाठी भगवान महावीर यांच्या शाश्वत विचारांचा मार्ग अवलंबविला पाहिजे. मानव कल्याणासाठी हे विचारच प्रेरक ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. भगवान महावीर यांनी पंचतत्त्वाच्या संवर्धनातून जीवन जगण्याची कला शिकविली असून, त्यांचा समावेश जीवनात करण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील अवगुणांवर मात करण्यासाठी ज्ञानाचा वापर करण्याचा संदेश भगवान महावीरांनी दिला. त्यांच्या या संदेशातूनच आत्मोन्नतीचा मार्ग दिसून येतो. भगवान महावीर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन चालले, तरच जगात शांतता राहिल, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)