शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

जैतापूर अणुभट्टीसाठी अयोग्यच!

By admin | Published: August 11, 2014 3:04 AM

भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याने १९७२ साली चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने भूभ्रंशांपासून ५ किमीपर्यंतच्या क्षेत्रात अणुभट्टी बांधता येणार नाही

मुंबई : भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याने १९७२ साली चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने भूभ्रंशांपासून ५ किमीपर्यंतच्या क्षेत्रात अणुभट्टी बांधता येणार नाही असे नमूद केले असून, याच अहवालाचा दाखला देत भारतीय पर्यावरण चळवळीने जैतापूरचे स्थळ अणुभट्टीसाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय पर्यावरण चळवळीने श्रृखंलात्मक कार्यक्रम हाती घेतला असून, मुंबईत पंधरवड्याने पर्यावरणाबाबत चळवळीचे कार्यक्रम होत आहेत. विशेषत: जैतापूर येथेही याबाबत जनजागृती होत असून, अणुऊर्जा खात्याच्या स्थान निवड समितीचे काही अहवाल माडबनचे डॉ. बी.जे. वाघधरे आणि प्रेमानंद तिवरकर यांना अथक प्रयत्नांती प्राप्त झाले आहेत. या अहवालातून अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे जेथे अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत तेथे माडबनच्या सड्याखाली भूभ्रंश (भूकवचातील भेग, तडा, फट) आहेत. प्रकल्पाच्या स्थळापासून ५ किमी अंतराच्या आत आणखी २ भूभ्रंश आहेत. शिवाय १०, १५, २४ आणि २५ किमी अंतराहूनही भूभ्रंश जात आहेत. प्रकल्पाच्या नजीकच्या क्षेत्रात याशिवाय अनेक सक्रिय भूभ्रंश आहेत.चतुर्वेदी समितीच्या अहवालातील ‘अणुभट्ट्यांच्या बांधकामाचा पाया घालणे’ आणि त्यासंबंधीचे ‘भूरचनाशास्त्र’ या प्रकरणात स्पष्ट केले आहे की, सुमारे २० ते ३० मीटर उंचीचा माडबनचा सडा (पठार) जांभा दगडाने बनलेला आहे. भट्ट्यांचे वजनदार आणि जोखमीचे बांधकाम पेलण्याची ताकद या सड्यामध्ये नाही. म्हणून तो पूर्णपणे काढून टाकावा. महत्त्वाचे म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाधितांकडून जमीन देण्यास गेलेला नकार हाच एकमेव अडथळा असल्याचे सरकारतर्फे भासविले जाते. मात्र या प्रकल्पाच्या अतिनिषिद्ध, प्रतिबंधित क्षेत्र आणि व्यवस्थापन क्षेत्राबाबत कोकणातील जनतेला माहिती देण्यात आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवाय येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे सुमारे १०० किमी त्रिज्येच्या वर्तुळातील क्षेत्र कायमचे निर्मनुष्य करावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णपणे तर रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मोठ्या भागांचा यात समावेश होईल. परिणामी, याबाबत राज्य आणि केंद्राने आताच गांभीर्याने विचार करावा; आणि स्थानिकांना न्याय द्यावा, असे पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरिश राऊत यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)