शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 19:31 IST

Devendra Fadnavis: जयंत पाटलांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे.

Jayant Patil Speech ( Marathi News ) : नाशिक जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मविआ उमेदवार राजाभाऊ वाझे आणि भास्कर भगरे यांचे अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना जयंत पाटलांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे.

कांदा प्रश्नावर केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, "काल परवा महाराष्ट्रातील कांदा पडून असताना फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्याचे पाप सरकारने केलं. त्यांना महाराष्ट्राचा कांदा दिसला नाही. विरोधात वातावरण जातंय पाहून देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयापाठोपाठ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. यातून मोदी साहेबांचे आभार मानले आणि सांगितले की, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यातबंदीही उठवली. मात्र हे सत्य नाही. मागचाच निर्णय पुन्हा घोषित केला आहे," असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्योग थांबवायचा असेल तर निवडणुकीत मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हा समोरचे बटन दाबून आपली माणसं दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी घ्या, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.

"संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण"

महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जिथं मतदान झालं आहे तिथं भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. "नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभा आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, तिथे मी जाऊन आलो. या सर्व भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण आहे," असं पाटील म्हणाले.

दरम्यान, "लोकांची गर्दी पाहून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार भास्करराव भगरे यांचा विजय निश्चित असल्याची जाणीव झाली," असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४