शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

न्याय कुठे मागायचा, यासाठी ११ वर्षे फरफट

By admin | Published: February 21, 2016 1:24 AM

खासगी कंपनीने नोकरीतून बडतर्फ केल्यानंतर त्याविरुद्ध न्याय कुठे मागायचा, याचा फैसला करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागल्याने, औरंगाबाद येथील एका कामगाराची

मुंबई: खासगी कंपनीने नोकरीतून बडतर्फ केल्यानंतर त्याविरुद्ध न्याय कुठे मागायचा, याचा फैसला करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागल्याने, औरंगाबाद येथील एका कामगाराची तब्बल ११ वर्षे फरफट झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या कामगाराच्या बाजूने निकाल देत, बडतर्फीविरुद्ध त्याने दाखल केलेले प्रकरण औरंगाबाद येथील श्रम न्यायालयात चालविण्याचा आदेश दिला.वडवाल नगर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद येथे राहणारे नंदराम आबाजी मांडगे यांनी त्यांच्या बडतर्फीविरुद्ध दाखल केलेले प्रकरण, औरंगाबादच्या श्रम न्यायालयाने येत्या सहा महिन्यांत निकाली काढावे, तसेच त्याच्या सुनावणीसाठी मांडगे व कंपनी या दोघांनीही येत्या ८ मार्च रोजी औरंगाबाद न्यायालयापुढे हजर राहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने दिला.नंदराम मांडगे मे. गरवारे पॉलिस्टर कंपनीत नोकरीला होते. कंपनीच्या वाळुंज (औरंगाबाद) येथील कारखान्यात त्यांनी बॉयलर अ‍ॅटेन्डन्ट व नंतर कनिष्ठ आणि वरिष्ठ सुपरवायझर म्हणून काम केले. त्यानंतर कंपनीने त्यांची बदली आधी सिल्वासा कारखान्यात व नंतर पाँडिचेरी येथे केली. मार्च २००५ मध्ये कंपनीने पाँडिचेरी येथील कारखाना बंद केला व तेच कारण देत, मांडगे यांना कामावरून कमी केले.या बडतर्फीविरुद्ध मांडगे यांनी औरंगाबाद येथील श्रम न्यायालयात अनुचित कामगार प्रथा कायद्यान्वये फिर्याद दाखल केली. बडतर्फी पाँडिचेरी येथे झालेली असल्याने फक्त तेथेच अशी फिर्याद दाखल केली जाऊ शकते, असा कंपनीने आक्षेप घेतला. श्रम न्यायालयाने तो अमान्य केला. पुढे औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालयानेही कंपनीचे म्हणणे मान्य केल्याने, मांडगे यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. शेवटी श्रम न्यायालयाने दिलेला निकालच सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला. कंपनीचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे आहे व पाँडिचेरीचा कारखाना बंद करण्याचा निर्णयही तेथेच झाला. त्यामुळे पाँडिचेरी व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणच्या श्रम न्यायालयांत दाद मागितली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. (विशेष प्रतिनिधी)अजून दुसरी इनिंग्ज बाकीखेदाची गोष्ट अशी की, मांडगे यांच्या फिर्यादीवर सुनावणी करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा निकाल औरंगाबादच्या श्रम न्यायालयाने सुरुवातीलाच दिला होता. तोच निकाल आता सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, पण हे होईपर्यंत ११ वर्षे निघून गेली आहेत व दरम्यान मांडगे यांनी सेवानिवृत्तीचे वयही पार केले आहे. औरंगाबादच्या श्रम न्यायालयात आता जो काही निकाल होईल, त्याविरुद्ध कंपनी किंवा मांडगे पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू शकतात हे लक्षात घेतले, तर मुळात मांडगे यांची बडतर्फी कायदेशीर होती की बेकायदा, याचा अंतिम फैसला व्हायला आणखी किमान १०-१५ वर्षेही लागू शकतात.