शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कांबा पुलाला संरक्षण कठडा नाही!

By admin | Published: June 05, 2017 3:01 AM

कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : पाताळगंगा नदीजवळ असलेल्या कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी वा संबंधित शासनाचे अधिकारी लक्ष घालत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या पुलावरून चांभार्ली गावाकडे जाता-येताना नाइलाजास्तव प्रवाशांना या पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.चांभार्ली व कांबे गावांतील ग्रामस्थांना जोडून ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहे. मात्र, पूल आमदार निधीतून बांधून चार ते पाच वर्षे झाली. तरी संरक्षक कठडा अद्याप बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहन उलटून नदीपात्रात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुलावरून विद्यार्थी, स्थानिक नागरिकांची नियमित वर्दळ असते. शिवाय, या पुलामुळेच कांबा व चांभार्ली गाव जोडले गेले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या पुलावरून जाणे पसंत करतात. हा पूल एकेरी वाहतुकीसाठी अरुंद तर आहेच; परंतु पुलाला संरक्षक कठडा नसल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच पावसाळ्यात या पुलावरून लहान मुले गतकाठीच्या साहाय्याने मासे पकडत असताना काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. तरी संबंधितांनी तत्काळ लक्ष घालून संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.