शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा ही चुकच !

By admin | Published: April 26, 2016 2:05 AM

जाती तोडो, समाज जोडो अभियानाप्रित्यर्थ बुलडाणा येथे आले असता रामदास आठवले यांची लोकमतशी चर्चा.

सिध्दार्थ आराख/बुलडाणाजेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने देशाविरूध्द घोषणा दिल्या नव्हत्या, हे आता सिध्द झाले आहे. या प्रकरणाच्या कारवाईत दिल्ली पोलिसांची घाई दिसून आली आहे. कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी कन्हैयावर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून चुकच केली, असे मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जाती तोडो, समाज जोडो ही कन्याकुमारीहून निघालेली भारत भीमरथ यात्रा रविवारी बुलडाण्यात दाखल झाली, त्यावेळी ते 'लोकमत'शी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली.प्रश्न : सध्या कन्हैयाच्या महाराष्ट्रात सभा आणि त्याच्यावर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, याबद्दल काय वाटते?कन्हैया कुमारवर हल्ले करून उगाच त्याला कोणी मोठे करू नये, तसा तो दोषीही नाही. त्याने व त्याच्या मित्रांनी देशाविरूध्द घोषणा दिल्या नव्हत्या; मात्र अफजल गूरुच्या फाशीच्या दिवशी कन्हैया आणि त्याचे संघटन एकत्र का आले होते, याचे उत्तर त्यानेच द्यावे. जेएनयुच्या घटनेमध्ये दिल्ली पोलिसांनीच त्याला मोठे केले. आता ठिकठिकाणी त्याच्यावर हल्ले करून त्याला पुन्हा हिरो बनविले जात आहे. हे चुकीचे आहे. हे थांबले पाहिजे.प्रश्न : रोहीत वेमुलाप्रकरणी आपली काय भूमिका काय ?रोहित वेमुलावर अन्यायच झाला. रोहीतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी झाली पाहीजे. मी स्वत: राज्यसभेत सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होता काम नये आणि आत्महत्येची वेळ तर येऊच नये. प्रश्न : वेगळ्य़ा विदर्भाच्या मागणीवर सर्वच विदर्भवादी एकत्र का येत नाहीत, ही श्रेयाची लढाई आहे काय? वेगळ्या विदर्भासाठी सर्वच विदर्भवादी एकत्र येत नसले, तरी सर्वांची मागणी एकच आहे. श्रेय कुणी घ्यायचे तो नंतरचा प्रश्न आहे. आधी विदर्भ वेगळा होऊ द्या. भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरच निवडणुका लढल्या आणि ते आपल्या मुद्यावर ठाम आहेत. शिवसेना वगळता सर्वच पक्ष आरपीआयसहीत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. प्रश्न : न्यायालयाचे आदेश असताना महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे योग्य आहे काय ? घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे मंदिरात महिलांनाही प्रवेश मिळायलाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. तो घटनादत्त अधिकार आहे. त्याचे उल्लंघन होऊ नये. प्रश्न : रिपाइंच्या ऐक्यावर केवळ चर्चा होते, ऐक्य का होत नाही ? चर्चा झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला मुर्त स्वरुप येत नाही. योग्य वेळी रिपाइंचे सर्व गट-तट एकत्र येतील आणि ऐक्य निश्‍चित होईल. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणण्याची गरज आहे. आपण स्वत: यासाठी पुढाकार घेणार आहोत. येणार्‍या निवडणुकीपूर्वी ऐक्य झाल्यास इतर पक्षांना हादरा बसेल यात शंका नाही. प्रश्न : येणार्‍या निवडणुकामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय राहील ? आम्ही भाजपला केवळ पाठिंबा दिला आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. येणार्‍या काळात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन पक्ष बांधणी करणार आहोत व सर्वच जातीच्या घटकांना पक्षात संधी देण्यात येईल.