शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

ठाकरे सरकारकडे कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही; कपिल पाटील यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 7:36 PM

राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता.

कल्याण-राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधीच मिळालेला नाही. भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यात हाच फरक आहे, अशी टिका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. या टिकेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील उद्यानाचा विकास माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून करण्यात आला होता. या उद्यानाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी उपरोक्त टिका केली. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, प्रेमनाथ भोईर, वरुण पाटील, मोरेश्वर भोईर, संजय कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी सांगितेल की, ठाणो-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पात भिवंडी ते कल्याण दरम्यान कामाची निविदा देखील अद्याप काढलेली नाही याकडे लक्ष वेधले.

आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही असे वक्तव्य केले होते. याविषयी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मंदा म्हात्रे यांची काय समस्या आहे हे मी सांगू शकत नाही. मात्र मोदी सरकारने 11 महिलांना मंत्री पद दिले आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात महिला कधीच मंत्री झाल्या नव्हत्या. तरी देखील भाजपने महिलांचा सन्मान केला नाही असे वक्तव्य करणो हे अयोग्य आहे. 

ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी थेट बोलावे 

महागाईच्या मुद्यावर कल्याणचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सोशल मिडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. 2014 मध्ये ज्यांना लोकसभेत निवडून दिले आहे. त्यांची जागा दाखवून द्या. याविषयी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जो ज्या संस्कृतीतून येतो. त्याची तशी भाषा असते. ही पोस्ट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वच खासदारांना लागू होते. ज्यांना आम्हाला बोलायचे आहे. त्यांनी थेट आम्हाला बोलावे असे आव्हान पाटील यांनी केले आहे. 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे