शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!

By admin | Published: September 09, 2016 5:28 PM

आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
कपिल शर्मांनी मुंबई महापालिकेच्या अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून केली काय, नी लगेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. शर्मांच्या आलिशान इमारतीच्या बांधकामप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्याचा दावा शर्मांनी केला आहे.
शर्माजी, महाराष्ट्रातली जनता असंख्य कैफियती घेऊन मंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, जागांच्या भावांचे प्रश्न असे सगळे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांची तंत्रज्ञानाप्रती असलेली रूची बघून अनेकांनी ट्विटर अकाउंट्सपण उघडली आणि जनतेच्या कैफियती मांडत मुख्यमंत्र्यांना टॅग पण केलं. पण, तक्रारीची दखल किंवा रिट्विट तर सोडा, साधं लाइकपण ते करत नाही हो..! 
पण तुम्ही एक कैफियत काय मांडली सगळं मंत्रालय नी मुंबई महापालिकेची फोर्टातली इमारत कामाला लागली की हो! 
तर आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना! माध्यम काही असो, व्यथांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं महत्त्वाचं, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता यावर आमचा विश्वास बसला आहे.
तर, शर्मासाहेब राज्याच्या जनतेच्या काही व्यथा देत आहोत, बघा जरा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वशिला लावता आला तर...
 
- कांद्याचा भाव कधी 2 रुपये किलो होतो तर कधी 100... एकतर शेतकरी भरडून निघतो किंवा ग्राहक. मध्यम भाव स्थिर करता येईल असं काही करता येईल का, एवढं जरा विचारा ना फडणवीस साहेबांना? 
 
- राज्याचं शिक्षणक्षेत्र म्हणजे खेळ झालाय साहेब. कारण क्रीडामंत्रीच आमचे शिक्षणमंत्री आहेत. नीटवरून झालेला घोळ ताजा आहेच... आता थेट पुढच्या वर्षी पुन्हा असाच घोळ होईल नीटपणे... विधी किंवा कायद्याच्या पहिल्या वर्षाच्या अॅडमिशन अजून झालेल्या नाहीत. इतर कॉलेजांमधलं एक सत्र संपत आलं. ती सगळी मुलं लॉच्या भावी विद्यार्थ्यांना हसतायत, तुमच्या शोमधल्या प्रेक्षकांसारखी. मुख्यमंत्र्यांना जरा सांगा की शिक्षण हे महत्त्वाचं क्षेत्र आहे, जरा सीरियसली घ्या की हे खातं.
 
- मुंबईत तुम्ही इमारत बांधताय... पण तुम्हाला माहित्येय का इथल्या भूमीपुत्राला वन रूम किचन नाही परवडत या शहरात... आता बदलापूर नी वसईपण खिशाबाहेर चाललेत नी इथला माणूस आता कर्जत नी विरारच्याबाहेर फेकला जातोय.
मुख्यमंत्र्यांकडे जरा शब्द टाकून जागांचे भाव उतरतील असं काही तरी करा की... तुम्ही हे केलंत ना शर्मासाहेब... तर हे लाखो लोकं, कम्प्युटरवर तुमचाच स्क्रीन सेव्हर ठेवतील आणि झोपले तरी कॉमेडी विथ कपिल शर्मा बंद न करता तुमचा टीआरपी वाढता ठेवतील.
- शर्माजी आमच्या पोलीसांवर लाचखोरीचे आरोप होतात, दंडेलशाहीचेही आरोप होतात. पण तुम्हाला खरं सांगू का, ते किती तास काम करतात, कधी झोपतात, काय खातात पितात, त्यांचं कुटुंब कसं वाढतं, पोरांना दिवसेंदिवस बापाचं तोंडदेखील बघायला मिळत नाही, रहायला पक्की घरं नाहीत, घरी गणपतीचं दर्शन घेता येत नाही आणि सार्वजनिक गणेशाला सुरक्षा पुरवावी तर मंडळाचे कार्यकर्ते धक्काबुक्की करतात. दहशतवादी एके-47 घेऊन येतात, नी आमचे पोलीस दंडुके घेऊन त्यांच्याची लढतात.
सगळ्या सरकारांनी पोलीसांना एवढी आश्वासनं दिलीयत ना, तेवढी तर 2014 मध्ये मोदीसाहेबांनी पण दिली नव्हती. तर, पोलीसांना चांगली घरं द्या, मुलांना शिक्षण द्या, नोकऱ्या द्या, भरती करताना पोरांची काळजी घ्या... (अति धावडवल्यामुळे रिकाम्या पोटी पोरांचे जीव गेलेत हे तुम्ही ऐकलं असेलंच.) आणि मुख्य म्हणजे संख्या वाढवा म्हणजे एका वेळच्या जेवणाला तरी ते घरी जाऊ शकतील.... 
त्यांना म्हणावं, शेकडो प्रकारचे अधिभार लावले आहेत ना आमच्या माथी... पोलिसांच्या कल्याणासाठी हवं तर आणखी एक अधिभार लावा...एवढं जरा तुम्ही आवर्जून सांगाच, मुख्यमंत्र्यांना...
यादी तर इतकी मोठी आहे ना शर्माजी की तुमचा कॉमेडी विथ कपिलचा रडारडी विथ कपिल होईल... पण एक आणखी महत्त्वाची मागणी तेवढी त्यांच्या कानावर घालाच...
त्यांना म्हणावं, जसं सेलिब्रिटींचा टिवटिवाट तुम्ही लक्ष घालून बघता ना, तसंच जरा स्थानिक वृत्तपत्रांवर पण अधेमधे नजर टाका म्हणजे रस्त्यांची स्थिती, महागाई, अनधिकृत बांधकामं, गुन्ह्यांचं व विशेषत: महिलांच्या व ज्येष्ठ नागिरकांच्या विरोधातील गुन्ह्याचं वाढतं प्रमाण अशा अनेक बाबी त्यांच्या ध्यानात येतील. जराशा विनोदी अंगानं, बोलता बोलता जमलंच तर... तुमच्याकडे गृहखातंही आहे अशी आठवणपण करून द्या त्यांना. काय आहे सणासुदीच्या काळात इतकी धामधूम असते की विसरायला होतात काही गोष्टी...