शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

संजय राऊत चीनचे एजंट!, महाराष्ट्रातील नेत्यांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 7:25 PM

महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊ

प्रकाश बेळगोजी बेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून दोन्ही राज्यातील नेतेमंडळीकडून एकमेकांवर वार-पलटवार सुरु आहेत. सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यात असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये सुरु झालेली हमरी - तुमरीवर जाऊन पोहोचली आहे. बेळगावमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचा निषेध करणारा ठराव मांडला.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकाला चेतावणी देत आपल्याला प्रवेश करू नाही दिला तर आपण चीनप्रमाणे कर्नाटकात प्रवेश करू असे विधान केले. यावर प्रत्त्युत्तर देताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी राऊत हे देशद्रोही आणि चीनचे एजंट असल्याचा आरोप केला. संजय राऊत आणि महाराष्ट्रातील नेते ज्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत यामुळे देशाची एकता भंग होत असून जर महाराष्ट्रातील नेते अशापद्धतीने प्रक्षोभक विधान करून कायदा-सुव्यवस्था आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांची अडवणूक कशी करायची आणि कशापद्धतीने कायदेशीर कारवाई करायची हे आपल्याला चांगलेच ठाऊक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ..यावरूनच महाराष्ट्रातील नेत्यांची वैचारिक क्षमता लक्षात येत महाराष्ट्रात सुरु असलेल्या अधिवेशनात 'कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना मस्ती आल्याचे' विधान करण्यात आले.  महाराष्ट्रातील नेतेमंडळी टीका-टिप्पणी करण्याचा दर्जा विसरले असून एका राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी बोलताना त्यांना भाषेचे भान राहिले नसून यावरूनच महाराष्ट्रातील नेत्यांची वैचारिक क्षमता लक्षात येत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शिवाय महाराष्ट्रातील प्रशासनाला तेथील जनता वैतागली असून तेथील राजकारण्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ज्याप्रमाणे येथील कार्यक्रमांना महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण मिळते त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील मंत्र्यांनाही सोलापूर, अक्कलकोट येथून आमंत्रणे येतात. मात्र येथील नेतेमंडळींना वेळ नसल्याने ते त्याठिकाणी पोहोचू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी आणि वारा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीयावेळी जयंत पाटील यांच्यावरदेखील मुख्यमंत्र्यांनी तोफ डागत कृष्णेचे पाणी देणे किंवा न देणे हे महाराष्ट्राच्या हातात नसून ती देशाची आणि नैसर्गिक संप्पती असून पाणी आणि वारा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे सांगितले. पुराणकाळापासून पाणी आणि वारा रोखणे कुणालाही शक्य झाले नसून देशातील नैसर्गिक संपत्ती हि राज्यापुरती मर्यादित नसल्याचे सांगितले. एकेकाळी जयंत पाटील यांच्याशी आपण जलविवादावर चर्चा केली. परंतु आता त्यांची भाषा बदलल्याचे सांगत कर्नाटकात सर्वाधिक लांब कृष्णा नदी वाहत असून कृष्णेचे पाणी रोखणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊमहाराष्ट्रातील नेत्यांना आपल्या भाषेत, आपल्या शैलीत आपल्याला उत्तर देता येणे सोपे आहे. परंतु हि आपली संस्कृती नाही. कर्नाटकातील लोक संस्कृती जपणारे आणि कायद्याचे पालन करणारे आहेत, मात्र मर्यादेपलीकडे आपण सहन करणार नाही आणि शांतही बसणार नाही, आपल्याला संविधान, हक्क आणि कायदा याबाबत संपूर्ण माहिती असून महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकSanjay Rautसंजय राऊतJayant Patilजयंत पाटील