शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

केडीएमसीतील वाद ‘वाटा’ आणि ‘घाट्या’चा

By admin | Published: September 18, 2016 2:40 AM

भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष संदीप गायकर व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यात पेटलेला वाद हा ‘वाटा’ आणि ‘घाट्या’चा असल्याची चर्चा आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष संदीप गायकर व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यात पेटलेला वाद हा ‘वाटा’ आणि ‘घाट्या’चा असल्याची चर्चा आहे. एखाद्या कामाकरिता केलेली तरतूद जेवढी मोठ्या रकमेची, तेवढीच त्यामधील वाट्याची रक्कम मोठी. मात्र, महापौरांनी तरतुदींना कात्री लावल्याने झालेल्या घाट्यामुळे राज्याच्या सत्तेतील हे पक्ष एकमेकांच्या उरावर बसले आहेत.महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना काही सदस्यांनी सादर केलेल्या उपसूचना ग्राह्य धरून त्याला महासभेत अंतिम मंजुरी दिल्यानंतर स्थायी समिती व महासभेच्या अधिकारावर महापौरांनी कुरघोडी करीत कोट्यवधी रुपयांची कामे लाखांच्या घरात आणली, असे सभापती गायकर यांचे मत आहे. समितीमधील सदस्यांनी सुचवलेल्या कामांना कात्री लागल्याने सदस्यांच्या रोषाचे गायकर हेच धनी झाले. त्यामुळे निर्माण झालेली खदखद त्यांनी व्यक्त केली. >२७ गावांना फटका बसला : महापालिका हद्दीत समावेश झालेल्या२७ गावांत पथदिवे उभारण्याच्या कामासाठी स्थायी समितीने ८५ लाख रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद महापौरांनी कमी करून ती २५ लाख रुपयांवर आणली. हायमास्ट बसवण्यासाठी ५० लाखांची असलेली तरतूद २५ लाखांवर आणली. कंत्राटदार मनपसंत नसल्याने विरोध कल्याण पश्चिमेत उभारल्या जाणाऱ्या सिटी पार्ककरिता किमान १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सविस्तर अहवाल व डिझाइन तयार करण्यासाठी कंत्राटदार नेण्यात आला आहे. हे कंत्राट ५४ लाख रुपये खर्चाचे आहे. त्याला मंजुरी दिली गेली असली तरी हा कंत्राटदार महापौरांच्या मर्जीतील नसल्याने महापौर नाखूश होते. त्यांना एक कोटी रुपये खर्चाची अन्य कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात स्वारस्य होते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.