शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

केडीएमसीच्या २७ गावांना वगळणार की ठेवणार?

By admin | Published: February 24, 2016 4:02 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळणार की ठेवणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ७ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळणार की ठेवणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ७ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सरकारने महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला या गावांतील काही नागरिकांनी विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना २७ गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. सरकारच्या या प्रस्तावाला स्थगिती देऊन निवडणूक प्रक्रियेलाही स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. तर राज्य सरकारनेही गावे वगळण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणे लांबणीवर टाकले. मंगळवारच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सरकारच्या प्रस्तावात तथ्य राहिले नसल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी विनंती न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाकडे केली. ‘आता निवडणूक झाली आहे. या गावांतून २२ नगरसेवक निवडणूक आले आहेत. सरकारच्या या प्रस्तावामुळे नाहक या भागाचा विकास रखडेल. या गावांसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा आदेश द्यावा,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठापुढे केला.वादग्रस्त २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यासाठी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर काही नागरिकांनी ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)