शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

केडीएमटीचे आगार टाकताहेत कात!

By admin | Published: January 18, 2017 4:04 AM

पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार

कल्याण : पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार आहे. आगारांच्या डागडुजीला परिवहन उपक्रमाकडून प्रारंभ झाला असून डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत वसंत व्हॅलीसह, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारांचा कायापालट केला जाणार आहे. केडीएमटीच्या उपक्रमाची २८ ठिकाणी आरक्षण आहेत. परंतु यातील गणेशघाट, वसंतव्हॅली आणि खंबाळपाडा आगार वगळता अन्य कुठलीही आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात नाही. आजच्या घडीला केवळ गणेशघाट आगार सुरु असून उपक्रमाच्या सर्व बस तेथूनच सुटतात. परंतु आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र तिन्ही आगारांमध्ये सर्रास दिसते. खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यात पावसाळयातील चिखलाची दलदल पाहता तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील वसंत व्हॅलीमधील आगाराच्या जागेतही पावसाळयात चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने येथेही आगाराबाहेर बस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे दोन्ही आगार उपक्रमासाठी निरूपयोगी ठरली आहेत. गणेशघाट आगाराची पुरती दुरवस्था झाली आहे. आगारात डांबरीकरण न झाल्याने पावसाळयात याठिकाणीही दलदल होते. आज ११० बस येथे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बस बाहेर काढताना गोंधळ उडतो. त्यातच पावसाळयात चिखलाचे साम्राज्य असल्याने तो तुडवतच चालकाला गाडीपर्यंत पोहचावे लागते. यामुळे सकाळच्या बस वेळेत बाहेर पडत नाहीत. या एकंदरीतच वास्तवतेवर ‘लोकमत’मध्ये ‘आॅन द स्पॉट’अंतर्गत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात बस आगारांची दुरवस्था, १७ वर्षात उपक्रमाला स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमले नाही, पांढरा हत्ता पोसता कशाला या मुद्यांकडे लक्ष वेधले होते. उत्पन्न आणि खर्चात तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारात वीजअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींचाही उल्लेख केला होता. पहिल्या टप्प्यात आगारांमध्ये डांबरीकरण आणि गटारांची कामे केली जाणार आहेत. यात वसंत व्हॅली आगारात डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. तर गणेशघाट आगारात सद्यस्थितीला गटार बांधणीचे काम सुरू असून लवकरच त्याठिकाणी डांबरीकरणाचे काम होणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर तात्पुरत्या कालावधीसाठी नवीन ३० बस वसंत व्हॅली आगारातून होणार आहे. खंबाळपाडा आगारातही डांबरीकरण, गटारबांधणीचे होणार आहेत. (प्रतिनिधी) >दुरवस्थेतील कार्यालये सुधारावीतआगारातील कार्यालये मोडकळीस आली असून येथील स्वच्छतागृहे, रेकॉर्डरूमची देखील दुरवस्था झाली आहे. कार्यालयांमध्ये घुशी आणि उंदरांचा सतत वावर असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहातील पंखे बंद, दिव्याचा पुरेसा प्रकाश नाही, अंथरायला चटई नाही, पावसात गळके छप्पर असे चित्र असल्याने कर्मचाऱ्यांचीही परवड होते. देखभाल दुरूस्तीअभावी येथील रॅम्पला देखील पावसाळयात गळती लागते. सुसज्ज कार्यशाळा नसणे हेही बसच्या नादुरूस्तीचे कारण असून टायर, गाडयांचे स्पेअरपार्ट आगारात विखुरलेल्या अवस्थेत पडले आहेत. ही परिस्थितीही लवकर सुधारावी अशी भावना कर्मचाऱ्यांची आहे.