शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

‘खरीप हंगाम संपला, पीककर्ज पुनर्गठनाचे काय?’

By admin | Published: October 06, 2016 5:01 AM

२६ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षातील ४ लाख ४२ हजार ९०२ शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९८ कोटी रूपयांच्या पीक

मुंबई : २६ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षातील ४ लाख ४२ हजार ९०२ शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९८ कोटी रूपयांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयानंतर सरकारने दोन महिने कोणताही पत्रव्यवहार केला नाही, मग कोणते पीक कर्ज पुनर्गठन केले गेले, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.माहिती अधिकारात उघड झालेली माहिती देताना सावंत म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दोन महिन्यांनी म्हणजे, १ जून २०१६ ला मुख्य सचिवांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना तर २ जून रोजी प्रधान सचिव यांनी रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांना पत्र पाठवले. परंतु खरिपाचा हंगाम संपला तरी ना रिझर्व्ह बँकेने शासनाला पत्राचे उत्तर पाठवले, ना शासनातर्फे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. सरकार केवळ मदतीचा देखावा करत आहे, असा आरोप करून सावंत म्हणाले, औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४९ हजार ५०० कोटी रूपयांच्या घोषणांची अतिवृष्टी करण्यात आली. मराठवाड्यातील जनतेला दाखवलेले हे दिवास्वप्न असून ही आकडेमोड केवळ जनतेचा असंतोष कमी करण्याकरिता होती.े मागील काही प्रकल्प, केंद्र सरकारच्या अखत्यारितील रस्त्यांचे प्रकल्प दाखवून आकडेवारी फुगवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)