शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 13:43 IST

मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाजारांची राजमुद्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्यावर घेतल्यानंतरचा वादा वाढला आहे. मनसेच्या या कृतीचा विरोध राज ठाकरेंना रस्त्यावर दिसत नसला तरी अनेकांच्या मनात राग धुमसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी अधिवेशन पार पडले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भगव्या रंगाचा झेंडा आणि त्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतली आहे. त्यामुळे अनेक मराठा संघटनांकडून राजमुद्रा झेंड्यावर घेण्यास विरोध करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर आता खेडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मराठा सेवा संघ आणि मराठा संघटनांच्या वतीने राज ठाकरेंच्या या कृतीला कायदेशीररित्या विरोध करण्याचे आम्ही ठरवलं आहे.  भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. त्याचवेळी मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

सावरकरांच्या फोटोवरून प्रश्न उपस्थित

मनसेच्या कार्यक्रमात सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. फोटो कोणते ठेवायचे हा प्रश्न त्या-त्या पक्षाचा आहे. सावकरांचे हिंदुत्व मनसेला मान्य आहे, असं वृत्त आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे होते हे खरं असले तरी ते समतावादी, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी विषमता असलेल्या समाजात एकता निर्माण केली होती. याउलट राज ठाकरेंना कोणते सावरकर अपेक्षीत आहेत, असा प्रश्न खेडेकर यांनी उपस्थित केला.

1924 पूर्वीचे सावकर हे हिंदु-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते. गायीचे पुजन करण्याची गरज नाही म्हणणारे होते. मात्र 1924 नंतर हिंदुत्व लिहून समाजा-समाजामध्ये वितुष्ठ निर्माण करणारे सावकर होते. मनसेला कोणते सावकर हवेत. त्याच सावकरांनी छत्रपती शिवाजी महाजारांना कातकालीय योगाने राजे झाले असं म्हटले आहे. याचा अर्थ कावळा उडायला आणि फांदी तुटायला अशा योगाने शिवाजी महाराज राजे झाले असं लिहून ठेवले आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला मानाने परत पाठवले, याला सावरकरांनी सज्जन विकृती म्हटले होते. असे सावरकर, राज ठाकरेंचे आदर्श असतील तर त्यांना शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे हे दिसून येते, अशी टीका खेडेकर यांनी केली.