शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'किरीट सोमय्यांनी धमकावलं, भाजपाने अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं', संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 10:48 IST

Anvay Naik Suicide Case: संजय राऊत हे किरीट सोमैय्या आणि भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून भाजपाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, संजय राऊत हे किरीट सोमैय्या आणि भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून भाजपाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले. तसेच या प्रकरणात आरोप झालेल्या अर्णब गोस्वामींकडे पैसे मागू नये, तसेच त्यांना बिल पाठवू नये, यासाठी किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दमबाजी केली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

याबाबत संजय राऊत म्हणाले की,अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली, यावर हे लोक बोलत नाही, त्यांनी यावर बोलंल पाहिजे. अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली, त्याच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाजी, पत्रकबाजी करत होते. एक मराठी माणूस मराठी उद्योजक अन्वय नाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे आत्महत्या केली. कारण अर्णव गोस्वामीला हे लोक वाचवत होते, असा आरोप राऊत यांनी केला.

या प्रकरणावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवरही आरोप केले, ते म्हणाले की, या किरीट सोमय्या यांनीसुद्धा त्याच्या आधी काही वेळा अन्वय नाईक यांना धमक्या दिल्या होत्या. अर्णव गोस्वामी यांच्याकडे पैसे मागायचे नाही, बिल पाठवायचे नाही, अशी दमबाजी केली होती. किरीट सोमय्या यांनी दोन वेळा अन्वय नाईक यांना धमकी दिली होती. भाजपाने अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते. हे अन्वय नाईक यांचे हत्यारे आहेत. त्यातील एक हत्यारा आज त्याच जमिनीवर जात आहे. भाजपावाले महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी लोकांना संपवू इच्छित आहे, असा आरोप संजय राऊन यांनी केला.

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. ते म्हणाले की, एक वेडा माणूस इकडे तिकडे फिरतोय. मी सांगितल्याप्रमाणे ते तुरुंगात जातील. किरीट सोमय्या तुरुंगात जाण्याचा रस्ता शोधत आहेत, मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही.

महाराष्ट्रातील जनता त्यांची धिंड काढणार आहे. कुठे बंगले आहेत ते दाखवा, ते बंगले अदृश्य झालेत काय. मी आधीच सांगितलंय की, त्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. याबाबत वारंवास स्पष्टीकरण झालेलं आहे. त्यांना स्वप्नामध्ये बंगले दिसतात. मला वाटतं भाजपाला भूताटकीनं झपाटलं आहे. त्यांना स्वप्नात स्वत:च्याच बेनामी प्रॉपर्टी दिसत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा