शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 09:07 IST

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ - शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला. 

कोल्हापूर - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) ५ वर्षात ५ पंतप्रधान असा जावईशोध नरेंद्र मोदींनी कुठून लावला? इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा नाही. पुरेसे संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास ५ वर्षात ५ पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधानांनी कुठून लावला?, आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. १९७७ साली जेपी नारायण यांच्याकडे लोक आकर्षित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला, तुमचा नेता कोण असं तेव्हा विचारले जायचे. तेव्हा मोरारजी देसाई यांचं नाव निवडणुकीनंतर पुढे आले. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल. त्याला पूर्ण सहकार्य देत स्थिर सरकार देत अखंड ५ वर्ष चालवलं जाईल. त्यामुळे ५ वर्ष ५ पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली. आमच्या डोक्यात नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय मोदींना समाधान वाटत नाही. त्यांची स्टाईल आहे, कोल्हापूरात आले तर नमस्कार कोल्हापूरकर असं बोलून सुरुवात करणार. पहिले ३-४ वाक्य त्यांचे स्थानिक नेते लिहून देतात ते बोलतात, कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचे नाव घेतले नाही, भाषणात कराडचा उल्लेख केला नाही, सातारचा केला असा टोला शरद पवारांनी लगावला. 

दरम्यान, विदर्भात उमेदवार प्रभावी असून ५० टक्क्यांच्या आत मतदान झालं, लोक उदासीन असतील किंवा आम्हा लोकांच्या कामामुळे अस्वस्थ असतील, अथवा वातावरणामुळेही मतदान कमी झालं असावं. आता मतदानाची टक्केवारी वाढतेय. या देशात अलीकडच्या काळात वास्तवता, सत्य लपवणारा पंतप्रधान पाहिले नाही. पंतप्रधान मोदी भाषणात खोट्या गोष्टी सांगतात. त्यांच्याकडे लोकांचे समाधान करण्याची खात्री दिसत नाही. त्यामुळे मूळ मुद्दे बाजूला ठेवून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न मोदींकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे लोक फारसं लक्ष देत नाही असंही पवार म्हणाले. 

धर्माच्या आधारे आरक्षण मान्य नाही 

धर्माच्या आधारे आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. हे कुणी केले तर त्याविरोधात संघर्ष करू. आता जातीय जणगणना करण्याची मागणी त्यामागील मुख्य कारणे समाजातील वंचित, शोषित घटकांची संख्या किती, त्यांच्यापर्यंत योजना पोहचवण्यासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानासारख्या व्यक्तीला केरळ, कर्नाटक यासारख्या दक्षिणेकडील राज्यात जास्त प्रतिसाद नाही. लोक त्यांना स्वीकारत नाहीत असं सांगत शरद पवारांनी धर्माच्या आधारे आरक्षणावरील टीकेवर प्रत्युत्तर दिले. 

शेती अन् ऊसाबद्दल पंतप्रधान अज्ञानी

एफआरपी ही पद्धत आम्ही सुरू केली, ते मोदींना माहिती नाही. त्यात आपोआप वाढ होत राहते, त्यामुळे त्यात सरकारला भाव ठरवावा लागत नाही. ऊस आणि शेती याबद्दल पंतप्रधानांना मर्यादित ज्ञान आहे असंही शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४