शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

By admin | Published: May 24, 2016 3:17 AM

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस असल्यास ताशी ४० किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे निर्देशही इंजिनचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग मंदावणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचणे असे प्रकार होऊन कोकण रेल्वे वारंवार विस्कळीत होते. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरलेली आहेत. या ठिकाणी सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत दरड कोसळूनही कोकण रेल्वे विस्कळीत झालेली नाही, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात ४00 कर्मचारी कोकण रेल्वेमार्गावर तैनात होते. यंदा ९५0 कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. गस्त घालतानाच काही मार्गांवर २४ तास वॉचमनही ठेवण्यात येतील. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ हालचालींसाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बी. आर. एन.चे एस्कॅव्हेटर तयार ठेवण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. प्रवासी ६६६.‘ङ्मल्ल‘ंल्ल१ं्र’६ं८.ूङ्मे किंवा १३९ डायल करून तसेच कोकण रेल्वेच्या १८00२३३१३३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रेनच्या स्थितीची माहिती घेऊ शकतात. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत कोकण रेल्वेवरून चालणाऱ्या गाड्यांचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांद्वारे फुटप्लेट निरीक्षणही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) आपत्कालीन उपाययोजना एखादी दुर्घटना झाल्यास अ‍ॅक्सिडंट रिलिफ मेडिकल व्हॅन, मेडिकल व्हॅन तैनात ठेवण्यात येईल. लोको पायलट, स्टेशन मास्तर, फिल्ड अधिकाऱ्यांना मोबाइल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. १0 जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू राहील.