शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

‘सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव!’

By admin | Published: March 09, 2016 5:56 AM

राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बरेचदा चांगल्या निर्णयांबाबतही गैरसमज निर्माण होतात, असा टोला हाणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बरेचदा चांगल्या निर्णयांबाबतही गैरसमज निर्माण होतात, असा टोला हाणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समन्वयाची बैठक नियमित घेण्याचा सल्ला मंगळवारी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांच्या आमदारांची बैठक झाली, त्यावेळी ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री राज्याच्या हिताचे निर्णय घेत असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण घटकपक्षांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न नियमितपणे झाला पाहिजे, असे ठाकरे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीसह राज्य सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती दिली. आपली सर्वांची मिळून शक्ती मोठी आहे. ती उद्यापासूनच्या अधिवेशनातूनही दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीचे सरकार २५ वर्षही कोणी घालवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी, विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्याची धमक आपल्यात आहे, असा विश्वास आमदारांना दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे निर्णय घेत असाल तर सरकारसोबत राहू, असा इशारा दिला. (विशेष प्रतिनिधी)