शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

मुंबईत उसळला ‘लाल’ जनसागर

By admin | Published: March 12, 2015 5:10 AM

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष आणि संघटनांनी

मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष आणि संघटनांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. दुपारी दीड वाजता भायखळ्यातील राणीबाग मैदानातून निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय सामील झाला होता. सरकारविरोधात निदर्शने करत जे.जे. उड्डाणपुलावरून निघालेल्या भव्य मोर्चामुळे लाल जनसागर उसळल्याचे चित्र निर्माण झाले होते.मोर्चामध्ये सामील प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडी पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी होती. ‘‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा’’, ‘‘नथुराम प्रवृत्ती हाणून पाडा’’ अशा घोषणा देत कार्यकर्ते आक्रोश व्यक्त करत होते. आम्ही पानसरे म्हणत प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. दुपारी साडेतीन वाजता आझाद मैदानावर धडकलेल्या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.सभेला संबोधित करताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अतिरेकी झालेल्या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. (प्रतिनिधी)