शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन सुरू

By admin | Published: July 14, 2017 5:00 AM

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गुरुवारी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गुरुवारी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या थेट खरेदीला सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली. सहा शेतकऱ्यांच्या जमिनी यावेळी खरेदी करण्यात आल्या.शिंदे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे. या महामार्गामुळे राज्यासह शेतकऱ्यांनादेखील समृद्धी येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीही अडचणी असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ हजार कोटींचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे कार्य सुरू आहे. जमीन खरेदीचा ऐतिहासिक टप्पा हिंगणा तहसील कार्यालयात शेतकरी व मंत्र्यांच्या संवादाने सुरू झाला. पहिल्या काही खरेदीखतांवर साक्षीदार एकनाथ शिंदे आणि ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी १२० शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यासाठी इरादापत्रेही दिली.शासनाने या प्रकल्पासाठी जमिनीला आजवरचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले असून, रेडी रेकनर अथवा बाजारभाव यापेक्षा जे जास्त असेल, त्याच्या पाचपट रक्कम मोबदला म्हणून मिळणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. >उद्धव ठाकरेंच्या निर्देशांचे पालनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकऱ्यावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. >राम आसरे शाहूंच्या नावे पहिले खरेदीपत्रमहाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या हिंगणा तालुक्यातील २७९ शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता असून कार्यक्रमाच्या वेळी सहा शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदीपत्र तयार करण्यात आले. ६ शेतकऱ्यांच्या ५.५९ हेक्टर जमिनीचे खरेदीपत्र तयार करण्यात आले व २ कोटी ६० लाख रुपयांचा मोबदला बँक खात्यात ‘आरटीजीएस’ने जमा होणार आहे. राम आसरे शाहू हे या प्रकल्पासाठी जमीन देणारे पहिले शेतकरी ठरल. त्यांच्या सव्वा हेक्टर जमिनीची शासनाने ५९ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केली. याशिवाय चंद्रा गायकवाड, सत्यभामा सोनारकर, मंदा फुलझेले, गोपाल मिसाळ-कल्पना मिसाळ यांची शेतजमिनीदेखील खरेदी करण्यात आली.>सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी भूसंपादनाच्या खरेदीपत्रावर स्वाक्षरी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हेदेखील उपस्थित होते.