शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

विद्यार्थ्यांसाठी अखेरची संधी

By admin | Published: June 27, 2017 2:27 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार, २७ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार, २७ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. आतापर्यंत सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात झाली होती. १३ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर, शुक्रवार, १६ जूनपासून मोठ्या संख्येने अकरावीचे अर्ज २ भरायला सुरुवात झाली, पण अर्ज २ भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्यामुळे, २१ जूनला प्रक्रिया संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर, प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांचा तणाव कमी झाला होता. आता २७ जूनला ही प्रवेश प्रक्रिया बंद होणार आहे. त्यानंतर, ३० जूनला अकरावीची सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात येईल. रविवारपर्यंत अर्ज १ चे २ लाख ४३ हजार अर्ज भरले गेले होते, तर अर्ज २ चे २ लाख १८ हजार भरले होते. सोमवारी २ ते ३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.