शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

ठाण्यातील पाणीपुरवठ्याचा तपासणी अहवाल अंतिम टप्प्यात - बबनराव लोणीकर

By admin | Published: April 02, 2016 1:33 AM

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबद्दल मनीषा चौधरी, किसन कथोरे, प्रशांत बंब, डॉ. पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, सुभाष पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजीत पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.लोणीकर म्हणाले की, मुरबाड तालुक्यामध्ये २००५पासून १८७ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर असून, १० वर्षांमध्ये त्यापैकी ४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३८ योजनांपैकी ३४ योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून, त्यातून पुरवठा सुरू करण्यात आला आहे. २१ योजनांची कामे सुरू असून, २३ योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्याने संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र माअंतर्गत मंजूर योजना वेगवेगळ्या कारणांमुळे अपूर्ण असून, याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत ठाणे जिल्ह्यातील १० वर्षांतील योजनांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात हा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांची माहितीही घेण्यात येत असून, अनेक योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात आला आहे, असेही लोणीकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)