शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये मुलाने वडिलांना आत्महत्या करण्यापासून रोखलं

By admin | Published: April 25, 2016 1:09 PM

अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे

ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 25 – अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे. धनराज शिंदे असं या शेतक-याचं नाव आहे. लातूरच्या शिरपूर अनंतपाल गावातील ही घटना आहे.
 
धनराज शिंदे नेहमीप्रमाणे शेतात चालले होते. मात्र त्यांनी आपली सामानाची बॅग, फोन काहीच घेतलं नसल्याचं त्यांचा 14 वर्षीय मुलगा पृथ्वीराजच्या लक्षात आलं, आणि लगेच त्याने वडिलांना रोखलं. 'मी त्यांना दोर गुंडाळताना पाहिलं होतं. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही आत्महत्या केलीत तर तुमच्यानंतर आमची काळजी घेण्यासाठी कुणीच नसेल', असं पृथ्वीराजने वडिलांना सांगितलं. त्यानंतर भावनिक झालेल्या धनराज शिंदे यांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला.
धनराज शिंदे यांची तीन एकर जमीन आहे. सलग 3 वर्ष शेतीतून काहीच उत्पन्न मिळालेलं नाही. पहिल्या वर्षी गारपीटीमुळे शेतीचं नुकसान झालं. आणि त्यानंतर सलग दोन वर्ष दुष्काळामुळे काहीच शेती झाली नाही. धनराज शिंदे यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत. त्यांच्यावर 15 लाखांच कर्ज आहे तरीही त्यांनी आपला लढा सुरु ठेवला होता. वायरलेस ऑपरेटरसाठी त्यांच्या मुलीला नोकरी मिळाली आहे. पण स्थानिक शासकीय कर्मचारी दिरंगाई करत असल्याने त्यांचा तणाव वाढला होता.
'माझ्या मुलांची खुप स्वप्ने आहेत. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे. जर निसर्गाने साथ दिली नाही तर त्यांच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकणार नाही', अशी भीती धनराज शिंदे व्यक्त करत आहेत. त्यांच्या 26 वर्षीय अर्चना या मुलीला संस्कृतमध्ये राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. तर त्यांचा मुलगा पृथ्वीराजला आयएएस अधिकारी बनायचं आहे.
 
'माझ्या मुलाने आत्महत्या करण्यापासून रोखलं नसतं तर काय झालं असत ? माझं कर्ज फेडण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. माझ्या मुलांच्या अपेक्षा पुर्ण करणं हे प्रत्येक दिवशी माझ्यासाठी एक आव्हान आहे', असं धनराज शिंदे बोलले आहेत