शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

पावसाळा लांबला तरच लातूरला रेल्वेने पाणी

By admin | Published: March 29, 2016 9:06 PM

लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते.

उपलब्ध साठा जूनअखेर पुरवणार : वितरणाचे काटेकोर नियोजन

लातूर : लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते. त्यामुळे पावसाळा लांबला तरच उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणावे लागेल. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ त्यावर मात करण्यासाठी १ हजारपेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे़ मांजरा, साई, नागझरी प्रकल्पामध्ये चर खोदण्यात येत असून त्याद्वारेही पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. टंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन केल्याने पाऊस वेळेवर पडल्यास संकट टळेल आणि रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असेही पोले यांनी सांगितले.रेल्वे वाहतुकीसाठी १८ तासांचा कालावधी लातूर-बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूरहून किमान ३० ते ३५ हजार लिटर क्षमतेचे १५ ते २० टँकर (वाघिणी) जोडून ते पाणी लातूरला आणण्याचा हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे़ एका खेपेत ७ ते ८ लाख लिटर्स पाणी आणण्याचा हा प्रस्ताव असून, या प्रक्रियेला किमान १८ तासांचा कालावधी लागेल़ या कालावधीत रेल्वे ट्रॅक कुठला रिकामा राहू शकतो किंवा कोणता ट्रॅक सोयीचा आहे, याबाबतचा विचार शासन पातळीवर सुरु आहे़- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी-लातूर