शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

By admin | Published: April 20, 2016 5:48 AM

पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते.

लातूर : पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र त्यातील निम्मे म्हणजे केवळ २५ लाख लीटर पाणी वाटप होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीतून उघड झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाणी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरासाठी रेल्वेने मिरजहून दररोज साधारण ५ लाख लीटर पाणी येते. शिवाय निम्न तेरणा प्रकल्पातून १२ लाख, डोंगरगाव बॅरेजेसमधून ३० लाख आणि साई ट्रेंचमधून ३ लाख लीटर असे रोज ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ प्रतिकुटुंब २०० लीटर याप्रमाणे लातूरकरांना दररोज २५ लाख लीटर पाणी पुरविले जाते. महापालिकेच्या दप्तरात ९० हजार घरांची नोंद आहे. भाडेकरूंसह एकूण कुटुंब संख्या १ लाख २० हजार आहे़ त्यांना आठ दिवसांना २०० लीटरप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे पालिकेचे म्हणणे ग्राह्य धरल्यास दररोज २५ लाख लीटर पाण्याचे वितरण होते़ शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकर आहेत़ स्थानिक स्रोतातून तसेच रेल्वेचे पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लीटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लीटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आठ दिवसांना २०० लीटर पाणी पुरत नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे़ शिवाय पाणी वितरणामध्ये दुजाभाव होत असल्याचाही आरोप होत असून, आठ दिवसांऐवजी पाच दिवसांनी पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)>पालिकेकडे पाणीवाटपाची प्रभागनिहाय नोंद आहे. तेथील चार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लीटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. - सुधाकर तेलंग, आयुक्तशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ४५ ते ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ तेवढेच पाणी नागरिकांना वितरित केले जाते़ ७० टँकरद्वारे ६ हजार लीटर क्षमतेच्या एका टँकरच्या सहापेक्षा अधिक फेऱ्या होतात़ शिवाय टँकर भरणा केंद्रातूनही नागरिक पाणी घेऊन जातात़ दिवसाला वितरण केवळ २५ लाख लीटर नसून ४५ ते ५० लाख लीटर होते.- कमलाकर फड, उपजिल्हाधिकारी