शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करणार

By admin | Published: January 15, 2016 1:56 AM

खासगी रुग्णालयांची बिल अवास्तव व सामान्यांच्या खिशाला न परवडणारी असल्याने, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे म्हणत सरकारी

मुंबई : खासगी रुग्णालयांची बिल अवास्तव व सामान्यांच्या खिशाला न परवडणारी असल्याने, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे म्हणत सरकारी वकिलांनी महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन्स) अ‍ॅक्ट, २०१४ चा मसुदा उच्च न्यायालयापुढे सादर केला.बिलाच्या वादामुळे भावाला जबरदस्तीने डांबण्यात आल्याने सेव्हन हिल्सच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी संजय प्रजापती यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. प्रजापती यांच्या भावाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे योग्य उपचार न झाल्याने संजय यांनी त्यांच्या भावाला अन्य रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज देताना बिलाचा आकडा फुगवला. ते बिल देण्यास नकार दिल्याने, रुग्णालयाने भावाला सोडण्यास नकार दिला, असे प्रजापती यांनी याचिकेत म्हटले आहे. ‘बिल न दिल्याने रुग्णाला डांबण्याचे प्रकार वाढत आहेत,’ असे निरीक्षण नोंदवत, खंडपीठाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखणार? अशी विचारणा सरकारकडे केली. सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी खासगी, सरकारी व महापालिका रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन्स) अ‍ॅक्ट, २०१४ चा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे म्हणत खंडपीठापुढे मसुदा सादर केला. हा मसुदा वाचल्यानंतर खंडपीठाने या मसुद्याचे कायद्यात रूपांतर केव्हा होणार? अशी विचारणा सरकारकडे केली. येत्या दोन आठवड्यात या संबंधी माहिती देऊ, असे आश्वासन अ‍ॅड. देशमुख यांनी खंडपीठाला दिले. बिलाचे पैसे न दिल्याने रुग्णाला कोणी डांबू नये, रुग्णालयाला आर्थिक नुकसानही होऊ नये, असा तोडगा काढणे आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले. कंपनी कायद्यात सुधारणा कराकाही लोक इतके आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात की, ते रुग्णालयाच्या बिलाची रक्कमही देऊ शकत नाहीत, असे म्हणत खंडपीठाने कंपनी कायद्यात सुधारणा करण्याची सूचना सरकारला केली. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली आहे.कॉर्पोरेट कंपन्यांनी मदत करावी‘रुग्णालयाचे बिल न देऊ शकणाऱ्या गरजूंसाठी कॉर्पोरेट्सने त्यांच्या वार्षिक उत्पन्नातील दोन टक्के उत्पन्न ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ म्हणून द्यावे. यामुळे गरीब रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मदतही होईल.रुग्णालायाला त्यांचे पैसेही मिळतील. त्यासाठी कंपनी कायद्यात अशी सुधारणा करणे आवश्यक आहे,’ असे म्हणत खंडपीठाने याबाबत सरकारला विचार करण्यास सांगितले.