शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा

By admin | Published: March 11, 2016 4:17 AM

राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच

नाशिक : राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच वर्षे दुसऱ्या पक्षात जाता येऊ नये आणि निवडणूकही लढवता येऊ नये, असा कायदा करायला हवा, असे परखड मत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘गोदावरी गौरव’चे वितरण गुरुवारी सायंकाळी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह साताऱ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, नृत्यांगना कनक रेळे, मुंबईचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार चित्रे, अमेरिकेत खडतर सायकल शर्यत जिंकणारे नाशिकचे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन, तर अहमदाबाद येथील वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘गोदावरी गौरव’ स्वीकारल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करीत नाना पाटेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर आता तरी शेतकऱ्याच्या गळ्यातील गळफास ढिला होईल, अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. पण एकटा माणूस काही करू शकत नाही, मागची पिलावळही महत्त्वाची असते.सुलभा देशपांडे, विजया मेहता यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आलो. पुढे बाबा आमटे या महामानवाशी संबंध आला. समाजासाठी काही करायचे त्यांनी पेरून ठेवले होते, ते आता ‘नाम’च्या रूपाने उगवले. शेतकरी केवळ कर्जामुळे नव्हे, तर इतर अनेक कारणांमुळे आत्महत्या करतात. औषधे परवडत नाहीत म्हणून अनेकांनी गळफास घेतल्याचे सांगत पाटेकर यांनी ‘नाम’च्या कार्याविषयी माहिती दिली. पुरस्कारांमुळे आपण कोणी तरी आहोत, असे वाटू लागल्यावर मी हेमलकशाला जातो. तेथे गेल्यावर आपण कोणीच नाही, याची जाणीव होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)