शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हिंदूंसाठी एक कायदा आणि मुसलमानांसाठी वेगळा कायदा ? - उद्धव ठाकरे

By admin | Published: July 04, 2016 11:15 AM

समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे. आज मोदी सरकारजवळ संपूर्ण बहुमत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे. आज मोदी सरकारजवळ संपूर्ण बहुमत आहे. या बहुमताचा आदर व्हावा इतकीच आमची अपेक्षा असेल तर कुणाच्या पोटात गोळा येऊ नये अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले आहे. 
 
समान नागरी कायद्याबाबत कायदा आयोगाचे मत मागविण्याचे जाहीर होताच अनेक मुस्लिम संघटनांनी आदळआपट व आगलावेपणाची भाषा सुरू केली. मात्र या सगळ्यांची पर्वा न करता केंद्र सरकारने समान नागरी कायद्याची ‘फाइल’ पुढे सरकवायला हवी. काँग्रेससारख्या पक्षांचे इतर विरोध मोडून मोदींचे सरकार पुढे चाललेच आहे. समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
एखाद्या गोष्टीवर वेळ काढायचा असेल तर विधी खात्याकडून मत मागितले जाते व या ‘मता’वर नंतर चांगलाच कीस काढला जातो, पण समान नागरी कायद्यावर असे काही घडू नये असे शिवसेनेचे मत आहे. 
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
- होईल काय? सरकारचे एक बरे असते. एखाद्या गोष्टीवर वेळ काढायचा असेल तर विधी खात्याकडून मत मागितले जाते व या ‘मता’वर नंतर चांगलाच कीस काढला जातो, पण समान नागरी कायद्यावर असे काही घडू नये व उगाच कीस काढला जाऊ नये असे आम्हाला वाटते. देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारने कायदा आयोगाकडून मत मागविले आहे. देशात सर्व धर्मांसाठी एक आणि एकच कायदा असावा ही मागणी शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाचीदेखील आहेच. हिंदुस्थान हा ‘सार्वभौम’ वगैरे स्वतंत्र देश असला तरी या सार्वभौम स्वतंत्र देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गेल्या ६० वर्षांत उच्छादच मांडला गेला. हिंदूंसाठी तो कितीही असह्य असला तरी या बेगडी लोकशाहीचे कोणीच काही वाकडे करू शकले नाही. सार्वभौम हिंदुस्थानात एक घटना नाही. हिंदूंसाठी एक कायदा आहे आणि मुसलमानांसाठी वेगळा कायदा आहे. खरे तर मुसलमानांसाठी वेगळे कायदे म्हणजे आणखी एका पाकिस्तान निर्मितीला ‘फूस’च ठरते, पण मतांच्या लाचारीपोटी मुसलमानांचे हे धार्मिक चोचले पुरवून देश खड्ड्यात घालणारे राज्यकर्तेच हा घात करीत आहेत. म्हणूनच समान नागरी कायद्याचा पुरस्कार करणार्‍या ‘मोदीं’चे राज्य देशावर आल्यापासून लाखो-करोडो राष्ट्रवादी जनतेच्या आकांक्षांना पालवी फुटली आहे.
 
- काँगे्रस शासन धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचेच लाड करीत आहे. हिंमत असेल तर देशात समान नागरी कायदा लागू करा!’ अशी परखड भूमिका मांडणार्‍यांचे राज्य देशावर आले आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर व संपूर्ण देशात समान नागरी कायदा आता नक्कीच लागू होईल, असे लोकांना वाटत असेल तर त्यांचे काय चुकले? पण मंदिराचा विषय न्यायालयात लटकला आहे. राम मंदिरप्रश्‍नी न्यायालयाचा निर्णय मानायला हवा, अशी समन्वयाची आणि समान नागरी कायद्याबाबत कायदा आयोगाचे मत मागवून वेळ मारून नेण्याची भूमिका केंद्रातील भाजप सरकारने घेतली आहे. समान नागरी कायद्याबाबत कायदा आयोगाचे मत मागविण्याचे जाहीर होताच अनेक मुस्लिम संघटनांनी आदळआपट व आगलावेपणाची भाषा सुरू केली. या सगळ्यांचा परिणाम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर होईल व ती निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच समान नागरी कायद्याचा ‘शंखनाद’ केला गेला असेल तर ते देशहिताचे नाही. 
 
- समान नागरी कायद्यातच हिंदुस्थानचे हित आहे. व्होट बँकेचे राजकारण देशात अस्थिरता, अराजक निर्माण करीत आहे. मुसलमानांत जी तिहेरी तलाक पद्धत आहे त्यामुळे या समाजातील महिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. ‘शरीयत’ म्हणजे इस्लामी कायद्याला मान्य नाही म्हणून कुटुंब नियोजन करायचे नाही. पाच बायका व पंचवीस पोरांचे लटांबर हे काही सुखी कुटुंबाचे लक्षण नाही. मुसलमान समाज अज्ञान, अंधकारात खितपत पडला आहे व या अंधारातून त्याने बाहेर पडावे असे मुल्लामौलवी व धर्मांध पुढार्‍यांना वाटत नाही यातच खरी ‘मेख’ आहे. समाज ज्ञानी झाला, विचार करू लागला, त्याला आपले बरेवाईट समजू लागले तर हा समाज आपल्या लुंग्यांना व दाढीला आग लावल्याशिवाय राहणार नाही, आपली राजकीय आणि धर्मांध दुकानदारी बंद होईल अशी भीती मुल्लामौलवी आणि धर्मांध मुस्लिम पुढार्‍यांना वाटते. मात्र या सगळ्यांची पर्वा न करता केंद्र सरकारने समान नागरी कायद्याची ‘फाइल’ पुढे सरकवायला हवी. काँग्रेससारख्या पक्षांचे इतर विरोध मोडून मोदींचे सरकार पुढे चाललेच आहे. समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे. आज मोदी सरकारजवळ संपूर्ण बहुमत आहे. या बहुमताचा आदर व्हावा इतकीच आमची अपेक्षा असेल तर कुणाच्या पोटात गोळा येऊ नये.