शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

सामाजिक बहिष्काराला पायबंद घालणारा कायदा

By admin | Published: March 12, 2015 6:03 AM

रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात सामाजिक बहिष्कार टाकण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे

मुंबई : रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात सामाजिक बहिष्कार टाकण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे किंवा त्यावर बहिष्कार टाकण्याच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी येत्या तीन महिन्यांत कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.समाजातील प्रथा परंपरा मोडीत काढल्यामुळे जातपंचायतींच्या माध्यमातून लोकांचा छळ होतो. काही प्रकरणांत तर एखादे कुटुंब किंवा कुटुंबातील व्यक्तीस वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सामाजिक बहिष्कार मागे घेण्यासाठी पैसा उकळला जातो, असा आरोप या सदस्यांनी केला. बहिष्कार टाकणाऱ्यांवर आणि बहिष्कार मागे घेण्यासाठी पैसा उकळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे ३४ गुन्हे दाखल झाले, त्यातील २८ प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अशा वाढत्या घटना लक्षात घेता गुन्हेगारांना जरब बसेल असा ठोस तरतुदी असलेला कायदा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यात ठोस तरतुदी असतील. जालना येथे घडलेल्या एका प्रकारात न्यायालयाने १० जणांवर दोषारोपपत्र ठेवले आहे. तर ३१ जणांच्या विरोधात याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला. रायगड जिल्ह्णात एकाच गोत्राचे असूनही लग्न केल्यामुळे दोन कुटुंबाना वाळीत टाकण्याची घटना घडली. त्यांच्याकडून जात पंचायतीने एक लाख ४५ हजार रु पये उकळले या प्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)