शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

शेतीचे गणित मांडणारा नेता

By admin | Published: December 13, 2015 1:27 AM

देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो,

- सुभाष जोशी

देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो, उत्पादन खर्च किती येतो, याचे गणितच शेतकऱ्यांना माहीत नव्हते. त्यांच्या जागृतीची चळवळ संपूर्ण देशात उभी करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. सरकारच्या शेतीविषयीच्या उदासीन धोरणाविरोधात सरकारला कोंडीत पकडण्याचे काम त्यांनी केले. ‘भारत’ व ‘इंडिया’ हे देश वेगळे कसे आहेत, हे दाखवून सरकारच्या डोळ्यांत त्यांनी अंजन घातले. शेतकऱ्यांची पिळवणूक कोणत्या मार्गाने सुरू आहे, याची शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी भाषणासह लेखणीतून केली. शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम महात्मा जोतिराव फुले यांनी केले. त्यांच्यानंतर तेवढ्याच ताकदीचे नाव कोणाचे घ्यायचे झाले, तर ते शरद जोशी यांचेच घ्यावे लागेल. देशातील कोणत्याही प्रांतात शेतकरी अडचणीत असेल, तर तिथे धावून जाऊन मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची पद्धत होती. तंबाखूचे आंदोलन चिघळल्यानंतर तितक्याच धैर्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे शरद जोशी हे एकमेव शेतकरी नेते होते. अस्मिता काय असते, हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणून त्यांच्या हक्कासाठी ते मैदानात उतरले. आयुष्यभर शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. हे करीत असताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, गुन्हे दाखल झाले, पण त्याची पर्वा न करता शेतकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्यांच्याकडे उमेद होती. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या नेतृत्वाची पोकळी सदैव जाणवत राहील.

(लेखक निपाणीचे माजी आमदार व शरद जोशी यांचे सहकारी आहेत.)