शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली, म्हणून...; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 3:41 PM

सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते असं दानवे म्हणाले.

मुंबई - उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली म्हणूनच हे सगळे बंड घडले, जे गेलेत ते बदल्यांमध्ये कसे घेतात? काम कशारितीने विकतात? नुसता धिंगाणा सुरू आहे. मंत्रालयात जाऊन बघा काम कुणाला मिळते, काम कसे होते. हे सगळे बाहेर येईल. आम्ही सोडणार नाही. टक्केवारी तुमची बंद केली, धंदे बंद केले हे सहन न झाल्याने तुम्ही निघून गेला हे लोकांना दिसते अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. 

अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी ठरवले असते तर हे बंड सहजपणे मोडून काढले असते. त्यांच्यासाठी फार काही अवघड नव्हते. परंतु ज्याच्या मनात गद्दारी रुजली आहे त्याला माझ्यासोबत का ठेवायचे असं ते म्हणत होते. ज्यावेळी बंड झाले तेव्हा तिथे गेलेले अनेक लोक उद्धव ठाकरेंसोबत होते, ते मुख्यमंत्री होते त्यामुळे ठरवले असते तर काहीही केले असते. यांना जाऊन द्यायचे नसते तर महाराष्ट्राची सीमा ओलांडून दिली नसती. पण सत्ता वाचवण्यासाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखे काम केले नाही. त्यांनी गद्दारी केली, भाजपाने फोडाफोडी केली, हे सत्तेसाठीच गेले होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते. काहीजण शिंदे गटात गेलेत त्यांच्याशी चौकशी व्हायला हवी. सगळ्यांना न्याय सारखा असावा. कोविड काळात देशपातळीवर जे काही घडले त्याचीही चौकशी व्हावी, तो काळ असा होता ज्या काळात २ पैसे जास्त की २ पैसे कमी पाहण्याचा वेळ नव्हता. मुंबईची चौकशी का, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर सगळीकडे चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही अंबादास दानवेंनी केली. 

दरम्यान,  ठाण्यात किती खरेदी केली अद्यापही काही सामानाचा वापर केला नाही. ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. मुंबई महापालिका ही देशातील महत्त्वाची महापालिका आहे. ही पुढे नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहराच्या विकासासाठी केवळ काम करत नाही तर कोट्यवधीचे फिक्स डिपॉझिटही केले. परंतु गेल्या काळात महापालिकेत लुटालूट सुरू आहे. जी-२० च्या नावाखाली उधळपट्टी झाली आहे. त्याविरोधातच १ जुलैला मोर्चा होणार आहे असं दानवेंनी म्हटलं. 

शिंदेंचे मानसिक संतुलन बिघडलंय बंड फसले असते तर एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला गोळ्या घातल्या असत्या असं दीपक केसरकर म्हणतात. हे खरे असेल तर मानसिक संतुलन कुणाचे बिघडले हे दिसते. मानसिक संतुलन एकनाथ शिंदेंचे बिघडले आहे. ही गद्दारी भाजपाच्या तालावर, ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपवण्यासाठी केली, शिवसेनेचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात फोफावली, तीच शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा