शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 15:57 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षतील नेते सैरभैर झाले. राष्ट्रवादीतील 20 हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले.

मुंबई - विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यमान आमदारांनी पक्षांतर केले आहे. तर काही नेत्यांनी पक्षांतराची तयारी केली आहे. मात्र अनेक दिवसांपासून पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नेत्यांना प्रवेशासाठी ग्रीन सिगनल मिळालेले नाही. त्यातच आता आचारसंहिता लागू झाली असून पक्षांतरचं काय, याची चिंता या नेत्यांना सतावत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षतील नेते सैरभैर झाले. राष्ट्रवादीतील 20 हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले. तर काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार छत्रपती उदनयराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून सत्ताधारी भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची एकच गर्दी झाली. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाजपकडून काही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला गेला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि काँग्रेसचे भारत भालके यांच्यासह सिद्धराम म्हेत्रे या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना आणि इच्छूकांच्या मुलाखतीला देखील दांडी मारली होती. त्यामुळे आपल्या पक्षात परतणे या नेत्यांसाठी कठिण आहे. तर रामराजे निंबाळकर यांनी वेळीच सावध भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले आहे.

दरम्यान स्वपक्षाचे दोर कापणाऱ्या या नेत्यांना आचारसंहिता लागू झाली तरी भाजप प्रवेशासाठी सिग्नल मिळालेले नाही. तर स्वत:च्या पक्षात परतणेही कठिण झाले आहे. अशा स्थितीत पुढं काय याची धडकी पक्षांतराच्या प्रयत्नात असलेल्या या नेत्यांना भरली आहे.