शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

नेतृत्व आता नाशिककडे!

By admin | Published: June 04, 2017 12:36 AM

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मुंबईत संप मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी नाशिकमधील बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मुंबईत संप मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी नाशिकमधील बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आहे. नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाट्याच्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. प्रशासनाने संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक जिल्ह्यातून बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे. नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे यांच्याशी चर्चा न करता शेतकऱ्यांनी त्यांना माघारी पाठविले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्ह्यातील बाजार समित्यांची कार्यालये सुरू असली तरी, व्यवहार मात्र झाले नाहीत. कळवणला पोलीस बंदोबस्तात शेतमाल पाठविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असता तेथील व्यापाऱ्यांनी असहकार दर्शविला. पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठामपुणतांबा (जि. अहमदनगर) : मुंबईत परस्पर संप मागे घेण्याचा निर्णय घेऊन किसान क्रांती समितीच्या सुकाणू समितीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोप करीत शनिवारी पुणतांबा ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत समितीचा धिक्कार केला. शेतकऱ्याचा सातबारा कोरा न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. किसान क्रांतीचा संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे, असे शनिवारी अभय चव्हाण, प्रमोद चौधरी, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, अरूण बोरबणे, विठ्ठल शेळके, प्रशांत काळवाघे आदींनी म्हटले आहे.किसान सभेची नाराजी; नवले बाहेर पडलेमुंबई : मुख्यमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संप मागे घेण्यास आपली सहमती नसल्याचे सांगत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले हे रात्री ३ च्या सुमारास ‘वर्षा’वरून बाहेर पडले. चर्चेला सुरुवात होताना ते अन्य शेतकरी नेत्यांसोबत होते.सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा ही संपाची मागणी होती. या दोन्ही मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुधाच्या भाववाढीचे गाजरही बेभरवशाचे आहे. असे असताना संप मागे घेऊ नका असे आपण वारंवार शिष्टमंडळातील सदस्यांना सांगत होतो, असे नवले यांनी सांगितले.