शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

साहाय्यक संपादक पद सोडून शेतीकडे

By admin | Published: March 15, 2015 1:21 AM

शहरातील जीवनशैली अंगीकारली की गलेलठ्ठ पगारासाठी दिवस-रात्र मेहनत करणे आणि दोन सुखाच्या क्षणांसाठी सुटीची वाट पाहात राहणे हे नशिबी येते.

शहरातील जीवनशैली अंगीकारली की गलेलठ्ठ पगारासाठी दिवस-रात्र मेहनत करणे आणि दोन सुखाच्या क्षणांसाठी सुटीची वाट पाहात राहणे हे नशिबी येते. पण अनेकदा शहरी वातावरणात वाढलेल्या व्यक्तींना ‘हेच खरे आयुष्य’ असे वाटू लागते. यामुळे स्वत: व्यवसाय सुरू करायचा, स्वत:साठी काम करायचे असे तरुणपणात पाहिलेले अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहते. धावत धावत जगताना त्यांना थांबताच येत नाही. पण दादरच्या सुमित भोसले याने गावी जाऊन व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मासिकातील साहाय्यक संपादकाच्या पदाचा राजीनामा दिला आणि शेती करण्यासाठी त्यांनी सावंतवाडीची वाट धरली. मुंबईतच मी लहानाचा मोठा झालो. लहानपणापासून स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा, असे मनात होते. पण नक्की काही ठरवले नव्हते. मुंबईतच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. फिजिक्स विषयात बीएस्सी केल्यावर आॅडिओ रेकॉर्डिंग आटर््सचा डिप्लोमा केला. शाळेनंतर मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. ट्रेकिंग करायला सुरुवात केल्यावर पुढच्या काही वर्षांत शहर सोडून गावाकडे राहायला जायचे, असे मनात पक्के केले. पण त्या वेळीही ट्रेकिंगशी निगडीत एखादा व्यवसाय गावाकडे सुरू करायचा असेच डोक्यात होते. महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मासिकात नोकरी मिळाली. याचबरोबरीने आॅडिओ रेकॉर्डिंगचा कोर्स केल्यामुळे त्या क्षेत्रातही थोडेफार काम सुरू केले. दोन्ही क्षेत्रांत कल्पकतेला वाव होता. पहिले काही दिवस काम करायला खूप मजा आली. कल्पकता वापरून नवनवीन गोष्टी करता येत होत्या. पण एक - दोन वर्षांतच हे सगळे काम चाकोरीबद्ध झाले. मुंबईसारख्या शहरात आॅडिओचे काम करताना कल्पकतेपेक्षा पैशाला महत्त्व असल्यामुळे त्याच पद्धतीने काम करणे भाग होते. कॉर्पोरेट जगात वावरताना एक ओळख निर्माण होत होती, चांगले पैसे मिळत होते. मासिकात मला कामामुळे बढती मिळत गेली. या वेळी मनात विचार सुरू होता, की वयाच्या ३५ वर्षांनंतर नोकरी सोडायची. तोपर्यंत पैसे साठवायचे. मग साठवलेल्या पैशातून गावाकडे जाऊन चाळिशीत व्यवसाय सुरू करायचा. पावणेदोन वर्षांपूर्वी साहाय्यक संपादक पदाचा राजीनामा देऊन शेतीकरिता पत्नीसह सावंतवाडीला राहण्यास आलो. सावंतवाडीला काही एकर जमीन होती. या जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर पत्नी अक्षयाने तत्काळ होकार दिला. मुंबईतील तिची नोकरी सोडून तीही सावंतवाडीला येऊन राहण्यास तयार झाली. निर्णय घेतला, पण या विषयातले ज्ञान नव्हते. मग आधी शेळीपालन करायचे ठरवले. शेळीचे संगोपन कसे करायचे, त्यांचे आजार कोणते, त्यांना खायला काय द्याव,े याचा दोन वर्षे अभ्यास केला. शेळीपालनात थोडा जम बसल्यावर मी सावंतवाडीला पूर्णपणे शिफ्ट झालो़ जमिनीची मशागत करून त्यावर भाज्या लावायला सुरुवात केली. जमिनीच्या काही भागात भातशेती होती. पण हा भात मार्केटमध्ये विकण्यास भात कसे लावायचे याचा अभ्यास सुरू केला. पण भातशेतीलाही वेळ लागतो. मग मी भाज्या, पपई, कलिंगड लावले. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. उत्पादन कमी असल्यामुळे उत्पन्न कमी आहे. शहरात धकाधकीच्या आयुष्यात पैसे मिळत होते, पण इथे मानसिक समाधान मिळते आहे. शहरात राहायचे असेल तर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. नोकरी करीत असतानाच गावाकडे व्यवसाय करणे शक्य नव्हते. माझे लग्न झाले. जबाबदारी वाढली. भविष्याचा विचार करताना एक जाणवले, की आताच मुंबई सोडली नाही तर पुढच्या काही वर्षांमध्ये मुंबई सोडून जाणे शक्य होणार नाही. जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील, मग त्या पूर्ण करण्यासाठी अजून पैसे लागणार. या वेळी साठवलेले पैसेदेखील कमी वाटतील. यात अडकायचे नसेल तर आताच नोकरी सोडून गावी गेले पाहिजे, हे उमजले. सावंतवाडीला असलेल्या जमिनीवर शेती करायची, असे मी ठरवले. पूजा दामले