शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

अन्नसुरक्षा योजनेवरून विधान परिषदेत गदारोळ

By admin | Published: March 13, 2015 1:37 AM

अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य देण्याच्या योजनेवरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि

मुंबई : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य देण्याच्या योजनेवरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अन्नसुरक्षेअंतर्गत केशरी कार्डधारकांचे धान्य वितरण बंद केल्याबाबतचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह तब्बल ३२ सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही आघाडी सरकारने त्यात १२० कोटींची भर घालत १ कोटी ७० लाख केशरी रेशनकार्डधारकांना योजनेत सामावून घेतले होते. पण केंद्र आणि राज्यात सत्ताबदल होताच, केशरी कार्डधारकांना योजनेतून वगळण्यात आले. त्यांना पुन्हा धान्य देण्याचा मुद्दा विरोधी बाकावरील सदस्यांनी लावून धरला. यावर, एपीएल कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी ४४ हजार आणि शहरी भागासाठी ५९ हजार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे उत्तर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिले. यावर सुनील तटकरे यांनी हरकत घेत सांगितले की, उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्राच्या नियोजन म्हणजेच आताच्या नीति आयोगाला आहे. त्यानंतर केंद्र सरकार ठरवते. या प्रक्रियेला बराच काळ लागू शकतो. पण तोपर्यंत या पावणेदोन कोटी कुटुंबांनी काय करायचे, असा सवाल तटकरेंनी केला. राज्याच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे. मात्र, बीपीएल धारकांना या योजनेतून अन्न दिले जात आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत केशरी कार्डधारकांबाबत निर्णय घेऊ, असे उत्तर बापट यांनी दिले.