शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

विधिमंडळाचे रेकॉर्डब्रेक कामकाज

By admin | Published: April 11, 2015 12:10 AM

सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, टोलमुक्ती, शेतक-यांचे पॅकेज, मुंबईचा विकास आदी सर्व विषयात सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. गारपीट, अवकाळी पाऊसाने पिडीत शेतक-यांना सरकारने आतापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकूण दहा हजार कोटींची मदत दिली. ऊस उत्पादक शेतक-यांच्या एफआरपीसाठी २ हजार कोटींच्या कर्जाची घोषणा करण्यायत आली असून त्यामुळे शेतक-यांना प्रतिटन २२५ रुपये मिळणार आहेत. शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईच्या विकासासाठी मेट्रो, मोनोसह सिडकोच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. युती सरकार सत्तेत आल्यापासून अपराधसिध्दीचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च अखेरीस हा दर ३८ टक्कयांपर्यंत पोहचले आहे. नागपूरच्या तुरुंगातून कैद्यांचे पलायन गंभीर घटना आहे. नागपूर तुरुंगात शंभरहून अधिक मोबाईल असून तुरुंगफोडीची घटना घडू शकते, असा स्पष्ट इशारा मागील सरकारला मिळाला होता. मात्र, या अहवालावर मागील सरकारने कारवाई केल्या नसल्याचा आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)