शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By admin | Published: May 05, 2016 1:41 AM

शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा.

लातूर : शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. केंद्र व राज्य शासनाने विचारविनिमय करुन त्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले.सेनेतर्फे लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणी पुरवठा, १०० ग्रामपंचायतींना तीन हजार लिटर्सची प्रत्येकी एक पाण्याची टाकी तसेच शहरात कचरा कुंड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सभेत ठाकरे म्हणाले, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, ते पाहण्याचे काम शिवसैनिकांचे आहे़ खचलेल्या शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी दिलासा दिला पाहिजे़ दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल.मी भाषणासाठी आलेलो नाही, मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या येथील जनतेला भेटायला, दिलासा द्यायला आलो आहे़ भाषणे करणारे दुसरे. आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन् दुष्काळावर राजकारणही करत नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांसाठी तुम्ही काय केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमधील कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. खा. सुळे यांनी काही दिवसांपूर्वी या भागाचा दौरा केला होता.सेनेतर्फे दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्या, जनावरांसाठी सिमेंटचे हौद, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. शिवजल क्रांती योजनेसाठी भैरवनाथ शुगर उद्योग समुहाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी ५१ लाखांचा धनादेश उद्धव यांच्याकडे सुपूर्द केला.‘शिवजलक्रांती योजनेस प्रोत्साहन देणार’बार्शी (सोलापूर) व मराठवाड्यासह अनेक भागात शिवसैनिकांनी चांगले काम केले असून, बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना मदत करण्यास शिवसेना मागे राहणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी बार्शी येथे दिली. परंडा- बार्शी तालुक्यातील योजनेच्या कामांची ठाकरे यांनी पाहणी केली़