शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

By admin | Published: February 20, 2016 3:09 AM

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आठ पानी धड्याचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, त्यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य चौथीच्या पुस्तकात शिकविले जात आहे. या पराक्रमाबरोबरच शिवरायांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलावांची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रमही त्यांच्या काळात राबविला गेला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात होती. शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरू) होते, हा इतिहाससुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्दिष्टाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.सरकारला शिवाजी महाराजांचा विसर : नवाब मलिकनिवडणुकीत ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला शिवजयंतीच्या दिवशी मात्र छत्रपतींचा विसर पडला आहे. शुक्रवारी एकाही वृत्तपत्रातून शिवरायांच्या जयंतीची जाहिरात करण्यात आली नाही. ‘मेक इन इंडिया’साठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जाहिरात न देणारे फडणवीस सरकार शिवस्मारकाबाबतही वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. मागील वर्षी शिवजयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.