शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पीककर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:40 AM

थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे.

- राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने या कर्जासाठी मागणी केलेली नाही. खरीप पेरणीचा हंगाम संपत आला आहेच पण त्याबरोबर या कर्जासाठी बाँड द्यावा लागत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे दहा हजार रुपये बियाणे व खते खरेदीसाठी देण्याचे आदेश जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे कोट्यवधी रुपये बँकेत पडून असल्याने सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दहा हजार रुपये देण्यास आढेवेढे घेतले; पण सरकारने समज दिल्यानंतर रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला; पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने या रकमेची उचल केलेली नाही. गेल्या आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील विभागीय सहनिबंधक, व जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, कोकण विभागातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून दहा हजार उचलीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. १५ जुलैपर्यंत उर्वरित विभागातून केवळ २२०० शेतकऱ्यांनीच कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे.