शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

तेलबियांकडे शेतक-यांची पाठ!

By admin | Published: January 23, 2016 2:01 AM

अमरावती विभागातील स्थिती ; केवळ आठ टक्के क्षेत्रावर पेरणी.

दादाराव गायकवाड/कारंजा लाड (जि. वाशिम): बदलत्या वातावरणासह कमी होणार्‍या मागणीमुळे तेलबियांच्या पेरणीकडे अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागाच्या गत दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गतवर्षीप्रमाणेच यंदाही सरासरी २६ हजार ४00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार १00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून, हे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. अमरावती विभागात पूर्वी तीळ, जवस, करडई, कारळ, सूर्यफूल, भुईमूग आदी तेलवाणांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होत असे. गळित हंगामात सूर्यफुलांनी बहरलेली पिवळी शेते सर्वत्र दिसायची; परंतु मागील काही वर्षांपासून सर्व सोयी-सुविधा असतानाही बदलत्या निसर्गचक्रामुळे कृषिव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. याचा अनिष्ट परिणाम पारंपरिक पीकपेरणीवर होत असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षांपासून अमरावती विभागात अत्यंत कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले असून, शेतकरी आता पेरणी करून आणखी धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्याचे पीकपेरणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गतवर्षी अमरावती विभागात सरासरी २६ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार २00 हेक्टरवर पेरणी झाली. यंदाही केवळ २ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच शेतकर्‍यांनी तेलबियांची पेरणी केल्याचे कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. गतवर्षी करडईची पेरणी १ हजार ४00 हेक्टरवर झाली; यंदा मात्र केवळ ७00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकंदर, अमरावती विभागातील बदलते वातावरण, घटत चाललेली मागणी आणि नगण्य दरामुळे तेलबियांच्या पेरणीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जवसाची पेरणीच नाहीगत दोन वर्षांत अमरावती विभागात एक हेक्टरवरही जवसाची पेरणी करण्यात आलेली नाही. यावरून हे तेलवाण नामशेष होत असल्याचे दिसत आहे. तिळाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले असून, मागील दोन्ही वर्षांत प्रत्येकी २00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीक्षेत्रात ६00 हेक्टरची वाढ झाली आहे. तथापि, १४ हजार हेक्टरपैकी केवळ ८00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली असून, त्याच्या पेरणीचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे.