शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

म्हाडाचे दीड वर्षाने विजेत्यांना पत्र

By admin | Published: October 08, 2015 3:15 AM

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना दिलासा मिळाला असून विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे.कोकण मंडळाने विरार-बोळिंज येथील १ हजार ७१६ घरांची लॉटरी जुलै २0१४ मध्ये काढली होती. या लॉटरीत अल्प व मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी हजारो अर्ज आले होते. मोठ्या संख्येने असलेल्या अर्जांमधून विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झाला होता. पण मंडळाकडून तब्बल दीड वर्ष उलटले तरी विजेत्यांना कोणतेही पत्र पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच आपल्याला घराचा ताबा कधी मिळणार याबाबत विजेत्यांना चिंता होती.दरम्यान, विजेत्यांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर डिसेंबरपर्यंत पात्रता निश्चिती करण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. छाननीनंतर अपात्र ठरणाऱ्यांची तातडीने सुनावणी करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्यांची पैसे भरण्याची पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.मंडळामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले नव्हते. अखेर इमारतींचे काम वेगाने सुरु असल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले आहे. विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.